________________
पाप-पुण्य
शहाण्यांची गोष्ट जाऊ द्या ना! कोणी चुकीचे वागत असेल आणि माफी मागत असेल तर मागू द्या ना! ‘धीस इज कम्प्लीट लॉ.' (हा संपूर्ण नियम आहे)
पश्चातापाचा सर्वश्रेष्ठ साबण! प्रश्नकर्ता : पाप दूर करण्यासाठी प्रायश्चिताशिवाय दुसरा कोणता उपाय आहे का?
दादाश्री : पाप दूर करण्यासाठी प्रायश्चिताशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. हे सर्व पाप, ते काय आहे? कशाला पाप म्हणत असतो आपण? तेव्हा म्हणे की, तुम्ही जे हे सर्व करतात ते करण्यास हरकत नाही. हे सर्व इथे बसलेले आहेत. आता कुणाला काही हरकत नाही. त्यात कोणी एखादा व्यक्ती म्हणाला की 'तुम्ही का उशिरा आलात?' असे आपल्याला म्हणाला, तेव्हा त्याने अतिक्रमण केले असे म्हटले जाईल. लोकांना हे आवडत नाही की हा असे का बोलतो? त्यास अतिक्रमण केले असे म्हटले जाईल. तो अतिक्रमण करतो, त्यासाठीच भगवंताने प्रतिक्रमण सांगितले आहे. म्हणजे पश्चाताप कितीचा करायचा आहे? तर लोकांना जे द:खदायी होईल, अशा गोष्टींसाठी पश्चाताप करावा. काय सांगतात? लोकांना जे आवडत असेल त्यासाठी नाही. म्हणजे प्रायश्चित करावे लागेल. तू करतो का?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : दादा भगवानांच्या नावाने प्रतिक्रमण करतो की नाही करत?
प्रश्नकर्ता : ते पुस्तक दिले आहे ना, त्यात म्हटल्याप्रमाणे करतो. नऊ कलमे करतो.
दादाश्री : करतोस ना? ते प्रतिक्रमणच आहे. दादा भगवानांच्या नऊ कलमांत दिले आहे ना ते सर्वात मोठे प्रतिक्रमण आहे. संपूर्ण जगासाठी कल्याणकारी असे ते प्रतिक्रमण आहे.