Book Title: Paap Punya
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 87
________________ ७६ पाप-पुण्य प्रकट होत नाही. स्वतः कशाप्रकारे पापांचा नाश करू शकेल? नवीन पुण्य नक्कीच बांधू शकतो, पण जुन्या पापांना नष्ट करू शकत नाही. ज्ञानी पुरुषांचे ज्ञानच पापांना नष्ट करून टाकते. बाकी, पुण्य आणि पाप, पाप आणि पुण्य यांच्या अनुबंधातच मनुष्य मात्र भटकत राहतो. ह्याच्यातून त्याला कधीही मुक्ती मिळत नाही. खूप पुण्य केले असेल तर जास्तीत जास्त, देवगती मिळू शकते पण मोक्ष तर मिळू शकणारच नाही. मोक्ष तर जेव्हा ज्ञानी पुरुष भेटतील आणि तुमच्या अनंत काळाच्या पापांना जाळून भस्मीभूत करून तुमच्या हातात शुद्ध आत्मा देतील तेव्हा मोक्ष होतो. तोपर्यंत चौऱ्यांशी लाख योनीत सारखे भटकतच राहायचे. ___ 'आम्ही' ज्ञान देतो तेव्हा चित्त शुद्ध करून देतो पापांचा नाश करून देतो आणि दिव्यचक्षु देतो, सर्व प्रकारे त्याच्या आत्म्याला आणि अनात्म्याला वेगळे करून देतो! विजा, महाविदेह क्षेत्राचा! प्रश्नकर्ता : महाविदेह क्षेत्रात कशाप्रकारे जाऊ शकतो? पुण्याने? दादाश्री : हे ज्ञान मिळाल्यानंतर आमची पाच आज्ञा पाळतो, त्याच्याने या जन्मात पुण्य बांधलीच जात आहेत ते पुण्य महाविदेह क्षेत्रात घेऊन जाते. आज्ञा पाळल्याने धर्मध्यान उत्पन्न होते. ते सर्व फळ देईल. आपल्याला मोक्षाला जायचे आहे. तिथे मोक्षाला जाऊ शकू एवढे पुण्य पाहिजे. इथे तुम्ही सीमंधर स्वामींची जितकी (भक्ति-आराधना) कराल, हे सर्व तुमच्या (पुण्यात) जमा झाले. तुम्ही सीमंधर स्वामींचे नाव तर ऐकले आहे ना? सध्या ते तीर्थंकर आहेत, महाविदेह क्षेत्रात आज त्यांची उपस्थिती आहे. सीमंधर स्वामींचे वय किती ६०-७० वर्षांचे असेल का? पावणे दोन लाख वर्षांचे वय आहे! अजून सव्वा लाख वर्ष जगणार आहेत! त्यांच्यासोबत तार जोडून देत आहे. कारण की तिथे जायचे आहे. इथून सरळ मोक्ष होणार

Loading...

Page Navigation
1 ... 85 86 87 88 89 90