________________
पाप-पुण्य
७७
नाही. अजून एक जन्म बाकी राहील. त्यांच्याजवळ बसायचे आहे म्हणून तार जोडून देतो.
आणि हे भगवंत संपूर्ण विश्वाचे कल्याण करतील. संपूर्ण विश्वाचे कल्याण होईल त्यांच्या निमित्ताने. कारण की ते जिवंत आहेत. जे मोक्षाला गेले आहेत ते काहीच करू शकत नाही, त्यांच्या भक्तीने फक्त पुण्य बांधले जाते, जे संसार फळ देते!
तिथे पुण्य आणि पाप, दोन्ही निकाली...
धर्म दोन प्रकारचे आहे. एक स्वाभाविक धर्म, त्याला रियल धर्म म्हणतात. आणि दुसरा विभाविक धर्म, त्याला रिलेटीव धर्म म्हणतात. जेव्हा 'शुद्धात्मा' प्राप्त होतो तेव्हा स्वाभाविक धर्मात येतो. स्वाभाविक धर्मच खरा धर्म आहे. या धर्मात चांगले-वाईट असे काही निवडायचे आहेच नाही. विभाविक धर्मात सर्व निवडायचे आहे.
दान देणे, लोकांवर उपकार करणे, ओब्लायजिंग नेचर (परोपकारी स्वभाव) ठेवणे, लोकांची सेवा करणे या सगळ्यांना रिलेटीव धर्म म्हटले आहे. त्याच्याने पुण्य बांधले जाते. आणि शिव्या दिल्याने, मारामारी केल्याने, लुटून घेतल्याने पापकर्म बांधले जाते. पुण्य आणि पाप जिथे आहे तिथे रियल धर्मच नाही. रियल धर्म पुण्य-पापरहित आहे. जिथे पुण्य-पापाला हेय (त्यागण्या योग्य) मानले जाते आणि स्वतःचे आत्मस्वरूप उपादेय (ग्रहण करण्या योग्य) मानण्यात येते तो रियल धर्म आहे. अर्थात 'हे रियल' आणि 'रिलेटीव' दोन्ही धर्म वेगळे आहेत.
जोपर्यंत 'मी कोण आहे' हे जाणत नाही तोपर्यंत पुण्य उपादेय रूपातच असते आणि पाप हेय रुपात असते. पुण्य आणि पाप हेय झाले, तिथे समकित! भगवंतांनी म्हटले आहे की पाप-पुण्य या दोन्हींवर ज्याला द्वेष किंवा राग नाही ते 'वीतराग' आहे!
- जय सच्चिदानंद