________________
पाप-पुण्य
दादाश्री : आमच्या इथे 'मुश्क' म्हणतात त्याला. ते बांधलेले असते ना. बिचाऱ्याला खायचे असेल तरीही खाऊ शकत नाही. डॉक्टरने शेठला सांगितलेले असते की, तुम्ही मरून जाल म्हणून... तसे या लोकांना मुश्क बांधलेले आहे.
अर्थात नुसती नरक यातना भोगत आहेत. मी सगळ्या शेठलोकांकडे जाऊन आलेलो आहे. मग इथे दर्शन करवतो, तेव्हा कुठे शांती मिळते. मी सांगतो, दादा भगवानांचे नाव घेत राहा. कारण की ज्ञान तर त्यांच्या हिशोबात येतच नाही. त्यांच्यासाठी तशी व्यवस्था केली ना, तरीही योग बसत नाही. म्हणून महादुःख आहे हे तर.
पुण्यशालीच उपभोग घेऊ शकतो! लक्ष्मी मनुष्याला मजूर बनवते. जर लक्ष्मी गरजेपेक्षा जास्त आली, तर मग मनुष्य मजूरासारखा होतो. त्याच्या कडे पैसा जास्त आहे पण सोबतच तो दानेश्वर आहे, म्हणून ठीक आहे. नाहीतर मजूरच म्हटला जाईल ना! आणि पूर्ण दिवस राबतच असतो, त्याला बायकोची पर्वा नसते, मुलांचा विचार नसतो, कोणाचीच पर्वा नसते, फक्त पैशांचीच पडलेली असते. अर्थात लक्ष्मी मनुष्याला हळूहळू मजूर बनवते आणि मग त्याला तिर्यंच गतीत घेऊन जाते. कारण की, पापानुबंधी पुण्य आहे ना! पुण्यानुबंधी पुण्य असेल तर हरकत नाही. पुण्यानुबंधी पुण्य कशाला म्हणतात की, पूर्ण दिवसात फक्त अर्धाच तास मेहनत करावी लागते. त्याने फक्त आर्धातासच मेहनत केली तर सर्व कामे सुरळीतपणे हळू हळू होत राहतात.
हे जग तर असे आहे त्यात उपभोग घेणारेही असतात आणि मेहनत करणारेही असतात. दोन्ही प्रकारचे असतात. मेहनत करणारे असे समजतात की 'हे मी करत आहे.' त्यात त्यांचा अहंकार असतो. जेव्हा की भोगणाऱ्यामध्ये तो अहंकार नसतो, तेव्हा त्याला भोक्तापणाचा रस मिळतो. आणि त्या मेहनत करणाऱ्याला अहंकाराचा गर्वरस मिळतो.
एक शेठ मला सांगतो की, 'या माझ्या मुलाला काहीतरी सांगा ना, त्याला मेहनत करायची नाही आणि आरामशीर भोगत राहतो. मी सांगितले,