________________
पाप-पुण्य
होतील, आणि पापाचे कार्य असेल, ते जर थोडेसेच, एकच रुपयाचे असेल तरीही ते तुमच्या खात्यात उधारीत लिहिले जाते. म्हणून त्या जमा असलेल्या शंभरातून एकही रुपया कमी होत नाही. असे जर कमी होत गेले असते तर कोणतेही पाप लागलेच नसते. अर्थात दोन्ही (पाप आणि पुण्य) वेगवेगळे राहतात. आणि दोन्हींची फळेही वेगवेगळीच येतात. पापाचे फळ येते तेव्हा ते कडू लागते.
___ पुण्यामधून पाप अशाप्रकारे कमी होत नाहीत. जर कमी झाले असते तर लोक तर खूपच पक्के, जरा सुद्धा दुःख आले नसते. एकही मुलगा किंवा मुलगी मेली नसती. नोकराने चोरी केली नसती. फक्त मज्जाच, केली असती. हे तर जेव्हा पुण्यकर्म घेरतात ना तेव्हा मोटारीत मौज-मजा करवतात, परंतु जेव्हा पापकर्म घेरतात ना, तेव्हा तीच मोटार अॅक्सिडन्ट करवते. हे तर सर्वच घेरतील. आत असेल तेवढे सामान घेरेल. आत नसेल तर कुठून घेरणार? जे काही आहे, तो (आपलाच) हिशोब आहे. यात काहीही फेरफार होणार नाही.
अजाणतेपणी झालेल्या पापांचे (?) प्रश्नकर्ता : हे मी पाप केले किंवा पुण्य केले अशी समजच नसेल तर पाप-पुण्य होते का? त्याला समजतच नसेल की हे मी पाप केले आणि हे मी पुण्य केले तर त्याचा काहीही परिणाम त्याला होणारच नाही ना?
दादाश्री : निसर्गाचा नियम असा आहे की तुम्हाला समज असेल किंवा नसेल, तरी सुद्धा परिणाम झाल्याशिवाय रहात नाही. झाडाला कापले तेव्हा यात पाप आहे की पुण्य आहे असे जरी तुम्हाला समजत नव्हते पण तरीही झाडाला दुःख तर झालेच ना? म्हणून तुम्हाला पाप लागले. तुम्ही चार तास उभे राहून रेशनच्या दुकानातून साखरेची पिशवी घेऊन जात असाल, आणि पिशवीला भोक पडले असेल आणि त्यातून साखर खाली पडत असेल तर साखर कुणाच्या तरी उपयोगी येईल की नाही? खाली असलेल्या मुंग्या साखरेच्या दाण्यांना घेऊन जातील आणि मुंग्यांचे भलं होईल. आता यास तुम्ही दान केले असे म्हणतात. जरी अजाणतेपणी केले, परंतु दान तर