________________
पाप-पुण्य
सुद्धा मिळणार नाही. उलट अंतराय पडते. लक्ष्मीची आठवण केल्याने मिळत नाही, ती तर पुण्य केल्याने मिळते.
५१
चार्ज अर्थात पुण्याचे चार्ज केले तर लक्ष्मी मिळते. ते सुद्धा फक्त लक्ष्मीच मिळत नाही. पुण्याच्या चार्जमध्ये ज्याची इच्छा असेल, जसे की मला लक्ष्मीची खूप गरज आहे, तर त्याला लक्ष्मी मिळते. कोणी म्हणेल, की मला तर फक्त धर्मच पाहिजे. तर फक्त धर्मच मिळेल आणि पैसे जवळ नसतीलही. अर्थात आपण ज्याप्रमाणे पुण्याचे टेंडर भरले असेल की मला असे (अमुक) पाहिजे. तर तसे मिळण्यात आपले पुण्य वापरले जाते.
कोणी म्हणेल, 'मला बंगले पाहिजे, गाड्या पाहिजे, असे पाहिजे, तसे पाहिजे.' तर त्यात पुण्य वापरले जाते. मग धर्मासाठी काहीच उरत नाही. आणि कोणी म्हणेल, मला धर्मच पाहिजे. गाड्या नको. मला तर एवढया दोन रूम असतील तरीही चालेल पण धर्मच जास्त पाहिजे. तर त्याला धर्म जास्त असतो आणि दुसरे कमी मिळते. अर्थात प्रत्येक जण स्वत:च्या हिशोबानुसारच पुण्याचे टेंडर भरतात.
दान म्हणजे पेरून कापणे!
प्रश्नकर्ता : जर आत्मा आणि दान यांचा काही संबध नाही तर मग हे दान करणे गरजेचे आहे की नाही?
त्याच्या
दादाश्री : दान म्हणजे काय? की देऊन, घ्या. हे जग प्रतिध्वनी सारखे आहे. अर्थात तुम्ही जसे कराल तसे प्रतिध्वनी पडतील, व्याजासहित. म्हणजे तुम्ही द्या आणि घ्या. हे जे मागील जन्मी दिले, चांगल्या कामासाठी पैसे वापरले, असे काही केले होते, त्याचे तुम्हाला फळ मिळाले, आता पुन्हा असे केले नाही तर मग सर्व धूळीस मिळेल. आपण शेतातून चारशे मण गहू तर घेऊन आलो पण भाऊ, त्यातील पन्नास मण जर पेरायला गेलो नाही, तर मग ?
प्रश्नकर्ता : तर उगणार नाही.
दादाश्री : असे हे सर्व आहे. म्हणून द्यायचे. त्याचा प्रतिध्वनीच पडेल