Book Title: Paap Punya
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 63
________________ ५२ पाप-पुण्य आणि परत येईल, अनेक पटीने होऊन येईल. मागील जन्मी दिले म्हणूनच तर अमेरिकेला यायला मिळाले, नाही तर अमेरिकेत यायचे काय सोपे आहे का? किती पुण्य केली असतील तेव्हा या प्लेनमध्ये बसायला मिळाले, कित्येक लोकांनी तर प्लेन बघितले सुद्धा नाही! __ प्रश्नकर्ता : जसे इंडियात कस्तुरभाऊ लालभाऊ यांची पिढी आहे, तर ती दोन, तीन, चार पिढ्यांपर्यंत पैसे चालत राहतात, त्यांच्या मुलांच्या मुलांपर्यंत, परंतु इथे अमेरिकेत कसे असते की पिढी असते, पण जास्तीत जास्त सहा-आठ वर्षातच सर्व संपुष्टात येते. किंवा मग पैसे असतील ते संपून जातात आणि नसतील तर परत येतात सुद्धा. तर याचे काय कारण असेल? दादाश्री : असे आहे, तिथले जे पुण्य आहे ना, इंडियाचे पुण्य, गाढ पुण्य असते, कितीही धुतले तरी जात नाही, आणि पाप सुद्धा असे गाढ असते की कितीही धुत राहिलो तरी जात नाही, म्हणजे वैष्णव असो किंवा जैन असो, पण त्यांनी पुण्य अशी घट्ट बांधलेली असतात की कितीही धुत राहिलो तरीही जात नाहीत. ते पेटलाद शहरचे दातार शेठ, रमणलाल शेठ त्यांची सात-सात पिढ्यांपर्यंत संपन्नता राहिली. खोऱ्याने पैसे उपसन देत असत लोकांना, तरीही कधी कमी पडले नाही. त्यांनी जबरदस्त पुण्य बांधले होते, खरी पुण्याई. आणि पापही असेच घट्ट बांधतात, की सातसात पिढ्यांपर्यंत गरिबी जात नाही. मर्यादे पलीकडे दुःख भोगतात, अर्थात एक्सेसही (जास्त) होते आणि मिडीयमही (मध्यम) राहतो. इथे (अमरिकेत) तर उतु ही येते, पुन्हा बसूनही जाते आणि पुन्हा उतु येते. बसून गेल्यानंतरही पुन्हा उतु येते. इथे वेळ लागत नाही आणि तिथे (इंडियात) बसून गेल्या नंतर पुन्हा उतु येण्यास खूप वेळ लागतो. अर्थात तिथे तर सात-सात पिढ्यांपर्यंत चालायचे. आता सर्व पुण्य कमी होऊन गेले. कारण काय होत असते? की कस्तुरभाऊच्या घरी जन्माला कोण येते? तेव्हा म्हणे की, त्यांच्यासारखाच पुण्यशाली असेल तोच जन्माला येतो. मग त्याच्याही घरी कोण जन्माला येतो? तसाच पुण्यशाली पुन्हा तिथे जन्माला येतो. तिथे कस्तुरभाऊचे पुण्य काम करत नाही. तर त्यांच्यासारखा

Loading...

Page Navigation
1 ... 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90