________________
३४
पाप-पुण्य
चोख व स्वच्छ हिशोब आहे की यात जरा सुद्धा कुणाचे चालेल असे नाही. तेव्हा हे अक्करमी असे मानतात की मी दहा लाख कमवले. अरे, यात तर तुझे पुण्य वापरले गेले आणि तेही वाईट मार्गी. यापेक्षा तुझ्या बुद्धीचा आशय फिरव. धर्मासाठीच बुद्धीचा आशय बांधण्यासारखा आहे. या जड वस्तू गाडी, बंगला, रेडियो या सर्वांची भजना केली, फक्त त्याच्याच साठी बुद्धीचा आशय बांधण्यासारखा नाही. धर्मासाठीच-आत्म धर्मासाठीच बुद्धीचा आशय ठेवा. आज तुम्हाला जे प्राप्त झाले ते भले असू दे, परंतु आता मात्र आशय बदलून संपूर्ण शंभर टक्के धर्मासाठीच ठेवा.
आम्ही आमच्या बुद्धीच्या आशयात पंच्याण्णव टक्के धर्म आणि जग कल्याणाची भावना आणली आहे. अन्य कुठेही आमचे पुण्य वापरले गेलेच नाही. पैसे, गाडी, बंगला, मुलगा, मुलगी कुठेही नाही.
आम्हाला जे जे भेटले आणि ज्ञान प्राप्त करून गेले, त्यांनी दोनपाच टक्के धर्मासाठी, मुक्तीसाठी ठेवले होते. म्हणून ते आम्हाला भेटले. आम्ही शंभरा पैकी शंभर टक्के धर्मात टाकले. म्हणूनच सगळीकडून आम्हाला धर्मासाठी 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' मिळाले आहे.
अनंत जन्मांपासून मोक्षाचा नियाणां (स्वत:चे संपूर्ण पुण्य लावून कुठल्यातरी एखाद्या वस्तूची मनोकामना करणे) केला आहे. परंतु पूर्णपणे पक्का नियाणां केला नाही. जर मोक्षासाठीच पक्का नियाणां केला असेल तर सर्व पुण्य त्यातच वापरले जाते. आत्म्यासाठी जगणे ते पुण्य आहे आणि संसारासाठी जगणे हे केवळ पाप आहे.
पसंती, पुण्याच्या वाटणीची... अर्थात हे पुण्य आहे ना, ते आपण जशी मागणी करू त्यात वाटले जाते. कोणी म्हणेल, मला इतकी दारू पाहिजे, असे पाहिजे, तसे पाहिजे तर त्यात वाटले जाते. कोणी म्हणेल, मला गाडी आणि घर पाहिजे. म्हणेल, दोन रूम असतील तरी चालेल. त्याला दोन रूम आणि गाडी वापरायला मिळाली याचे समाधान असते.
या लोकांना संतोष रहात असेल, छोटया-छोटया झोपड्यांमध्ये राहतात