________________
३८
पाप-पुण्य
पण असे पुरेसे पुण्य आणले नाही म्हणून. नाही तर प्रत्येक गोष्ट जशी हवी तशी मिळेल असे आहे. पण लोक लौकिक ज्ञानात पडलेले आहेत आणि तोपर्यंत कधीही 'वस्तू' प्राप्त होत नाही. एक तर डोक्याचा थोडा तापट असेल, त्यात जर त्याला असे ज्ञान मिळाले की 'बूधे नार पांसरी' (मारल्याशिवाय स्त्री वठणीवर येत नाही) अर्थात त्याला हवे होते ते मिळाले! हे ज्ञान मिळाले तर हे ज्ञान त्याला फळ देणार की नाही देणार? नंतर काय होणार? ज्या स्त्रीच्या पोटी तीर्थंकर जन्मले त्या स्त्रीची दशा, तुम्ही कशी केली ते तर पहा!? किती अन्याय आहे? कारण ज्या स्त्रीच्या पोटी चोवीस तीर्थंकर जन्मले, बारा चक्रवती जन्मले, वासुदेव जन्मले तिथेही असे केले? जरी तुम्हाला कडू अनुभव झाला. पण त्यात स्त्री जातीची निंदा का करता? तुम्ही बारा रुपये डझनच्या भावाने आंबे घेऊन येता पण ते आंबट निघतात आणि तीन रुपये डझनच्या भावाने आंबे आणले ते खूप गोड निघतात. अर्थात पुष्कळ वेळा वस्तू किमतीवर आधारित नसते, तुमच्या पुण्याच्या आधारावर ठरत असते. जर तुमच्या पुण्याचा जोर असेल तर आंबे गोड निघतील. आणि आंबे आंबट निघाले त्यात तुमच्या पुण्याचा जोर नव्हता, म्हणून त्यात कुणाला का दोष द्यावा?
___ म्हणजे यात तर पुण्यच कमी पडते, दुसरे काहीच नाही? मोठा भाऊ संपत्ती देत नसेल तर त्यात काय मोठया भावाचा दोष आहे का? आपले पुण्य कमी पडले. यात कुणाचाही दोष नाही. तर हा पुण्याला सुधारत नाही आणि मोठया भावासोबत नुसते पाप बांधतो! मग पापाचे द्रोण जमा होतात.
आपल्याला घराची अडचण असेल अशावेळी एखाद्या माणसाने राहण्यासाठी घर देऊन आपल्याला मदत केली, तर जगातील माणसांना त्याच्यावर राग (मोह, आसक्ति) होतो आणि जेव्हा तो मनुष्य घर परत घेतो तेव्हा त्याच्यावर द्वेष होतो. हा राग-द्वेष आहे. ह्यात खरोखर तर राग-द्वेष करण्याची गरज नाही. तो तर निमित्तच आहे. तो देणारा आणि परत घेऊन घेणारा, दोघेही निमित्त आहेत. जेव्हा तुमच्या पुण्याचा उदय असतो तेव्हा तो देण्यासाठी भेटतो आणि जेव्हा तुमच्या पापाचा उदय असतो तेव्हा घेण्यासाठी भेटतो. त्यात त्या व्यक्तीचा काही दोष नाही. तुमच्या उदयाच्या
घेणारा, दोघेही निमा आणि जेव्हा तुमच्या दोष नाही. तुमच्य