________________
पाप-पुण्य
२७
कसे पुण्य हवे मोक्षासाठी? प्रश्नकर्ता : जो पर्यंत मोक्षमार्गावर पोहचलो नाही, तोपर्यंत पुण्यरूपी मार्गदर्शकाची गरज तर आहेच ना?
दादाश्री : हो, पुण्यरूपी मार्गदर्शकासाठी तर लोक शुभाशुभमध्ये पडले आहे ना! ह्या मार्गदर्शकाकडून सर्वच मिळेल. मोक्षमार्गे जात असतांना पुण्य बांधले जाते परंतु अशा पुण्याची गरज नाही. मोक्षात जाण्याऱ्यांचे पुण्य तर कसे असते? त्याला जगात सुर्यनारायण उगवला की नाही, तेही माहित नसते आणि संपूर्ण आयुष्य निघून जाते, असे पुण्य असतात. तर मग अशा कचऱ्या समान पुण्याला काय करायचे?
__ होत नाहीत, वजा पापं कधी! प्रश्नकर्ता : हा मार्ग मिळत नाही तो पर्यंत ह्या पुण्याची गरज आहे ना?
दादाश्री : हो, हे बरोबर आहे. पण लोकांजवळ पुण्य आहेच कुठे? काहीच ठिकाणा नाही. कारण की तुमची इच्छा काय आहे? तेव्हा म्हणेल की, मी पुण्य केले तर पापाचा उदय येणार नाही. त्यावर भगवंत काय म्हणतात? तु शंभर रुपयांचे पुण्यकर्म बांधले असेल, तर तुझ्या खात्यात शंभर रुपयांचे पुण्य जमा होईल. त्यानंतर तु दोन रुपयांएवढे पाप केले, म्हणजे तु एखद्या माणसाला 'हट, हट दूर हो' असे म्हटले, त्यात थोडासा तिरस्कार आला. आता याचे जमा- उधारी असे होत नाही. भगवंत काही कच्ची माया नाही. जर पुण्य-पापाची जमा-उधारी झाली असती तर ह्या वाणी लोकांच्या पदरी जरा सुद्धा दुःख आले नसते! पण हे तर सुखही भोगायचे आणि दु:खही भोगायचे, कसे पक्के आहेत भगवंत!
प्रश्नकर्ता : पुण्याच्या रस्त्याने जर मनुष्य जात असेल तर मग पाप कशा करता येते?
दादाश्री : हा तर नेहमीचाच कायदा आहे ना, की कोणतेही कार्य तुम्ही केले, समजा पुण्याचे कार्य केले तर तुमच्या खात्यात शंभर रुपये जमा