Book Title: Paap Punya
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 40
________________ पाप-पुण्य २९ होते ना? जरी तुमच्या जाणिवेत नाही, तरीही दान तर दिले जात आहे ना? आणि मुंग्यांना सुख मिळते ना? त्यामुळे तुमच्याकडून पुण्यकर्म होते. त्याचे फळ सुद्धा अजाणतेपणीत भोगले जाते ! कित्येक असे म्हणतात की, अजाणतेपणी पाप झाले तर त्याचे फळ येत नाही? मुर्खा, अजाणतेपणी विस्तवावर हात ठेव म्हणजे समजेल की फळ येते की नाही. जाणतेपणीने केलेले पाप आणि अजाणतेपणी केलेले पाप हे दोन्हीही सारखेच आहेत. परंतु अजाणतेपणी केलेल्या पापाचे फळ अजाणतेपणी आणि जाणतेपणी केलेल्या पापाचे फळ जाणतेपणी भोगावे लागते, एवढाच फरक. बस, ही पद्धत आहे. हे सर्व कायदेशीर आहे. हे जग पूर्णपणे कायदेशीर आहे, न्यायस्वरूप आहे. अजाणतेपणी जे घडते त्याचे फळ अजाणतेपणी मिळते. हे मी तुम्हाला समजवून सांगतो. एक मनुष्य सात वर्ष राज्य करतो आणि दुसरा मनुष्यही सात वर्ष राज्य करतो. म्हणजे दोन्ही माणसांचे राज्य करणे एक सारखेच आहे आणि दोघांची राज्येही सारखीच आहे पण यातील एक मनुष्य वयाच्या तिसऱ्या वर्षी राजगादी वर बसतो आणि दहा वर्षाचा होई पर्यंत राज्य करतो आणि दुसरा मनुष्य वयाच्या विसाव्या वर्षी राजगादीवर बसतो, ते सत्ताविस वर्षाचा होई पर्यंत राज्य करतो तर यात कोणी खऱ्या अर्थाने राज सुख उपभोगले असे म्हणता येईल? पहिल्यावाल्याचे तर बालवयातच निघून गेले, जर कोणी खेळणी दिल्या तर, तो खेळणीच खेळत बसेल! त्याला अर्थात हे अजाणतेपणी केलेल्या पुण्याचे फळ आहे. त्याने अजाणतेपणी, समजल्याशिवाय, दर्शन केले होते म्हणून तो समजल्याशिवाय फळ भोगतो. समजपूर्वक केलेल्याचे फळ समजपूर्वक भोगतो. त्याच प्रमाणे जागृत मनाने केलेले पाप जागृतिपूर्वक भोगावे लागते आणि अजागृतिपूर्वक केलेले पाप अजागृतिपूर्वक भोगावे लागते. यात बालपणाच्या तिसऱ्या वर्षी जर आई मरून गेली तर ते मुल रडत वगैरे नाही. त्याला तर माहितही नसते. समजतच नसते, तर काय करेल? आणि

Loading...

Page Navigation
1 ... 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90