________________
निर्दोष आहे. कारणाशिवाय कार्यात कशाप्रकारे येईल? स्वतः अपमानित होण्याची कारणे बांधून आणली आहेत त्याचेच फळ, त्याचाच इफेक्ट येऊन उभा राहतो तेव्हा, दुसरी दिसणारी कितीतरी निमितं त्यात एकत्र व्हावी लागतात. फक्त 'बी' ने फळ नाही पिकत. पण सर्वच निमित्ते एकत्र झाली तरच बीज मधून झाड तयार होते व फळ खायला मिळते. म्हणजे हे जे फळ येते त्यात दुसऱ्या निमितांशिवाय फळ कशाप्रकारे येईल? अपमान खाण्याचे (अपमानित होण्याचे) बीज आपणच पेरले होते, त्याचे फळ अपमान मिळतो. अपमान मिळण्यासाठी इतर निमितं एकत्र यावी लागतात. आता या निमित्तांना दोषीत पाहून कषाय (क्रोध,मान,माया,लोभ) करुन मनुष्य अज्ञानतेने नवे कर्म बांधतो. परंतू जर ज्ञान हजर राहिले की समोरची व्यक्ति तर निमित्तच आहे, निर्दोष आहे, आणि हा अपमान मिळतो ते माझ्या कर्माचे फळ आहे, तर नवीन कर्म बांधले जात नाही. आणि त्यामुळे मुक्त रहाता येईल. समोरची व्यक्ति दोषीत दिसली की लगेच त्याला निर्दोष पहावे, आणि त्याला दोषीत पाहिल्या बद्दल लगेचच प्रतिक्रमण शूट एट साइट करून टाकायचे, ज्यामुळे बीज शेकले जाईल आणि परत उगणारच नाही.
दुसरी सर्व निमित्तं एकत्र येवून स्वतः टाकलेल्या बीजाचे फळ येणे आणि स्वत:ला भोगावे लागणे, ही सर्व प्रोसेस (प्रक्रिया) फक्त सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे आणि त्यालाच दादाश्रींनी 'व्यवस्थित शक्ति' फळ देते, असे म्हटले आहे.
'ज्ञानी पुरुष' परम पूज्य श्रीदादा भगवानांनी स्वत:च्या ज्ञानात अवलोकन करुन जगाला 'कर्माचे विज्ञान' दिले आहे. जे दादाश्रींच्या वाणीत येथे संक्षिप्तमध्ये पुस्तक रुपात ठेवले आहे, जे वाचकांना जीवनात गोंधळून टाकणाऱ्या कोडयांची समाधानकारक उत्तरे देतील.
- डॉ. नीरुबहेन अमीन चे जय सच्चिदानंद.