Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 22
________________ कर्माचे विज्ञान जो बसला आहे त्याला बंधन आहे. 'मी बांधलेला आहे, मी देह आहे, मी चंदुभाऊ आहे' असे मानतो, त्याला बंधन आहे. प्रश्नकर्ता : म्हणजे आपल्याला असे म्हणायचे आहे की आत्मा देहाच्या माध्यमातून कर्म बांधतो, आणि देहाच्या माध्यमातून कर्म सोडतो? ___ दादाश्री : नाही, असे नाही. आत्मा तर ह्यात हात घालतच नाही. खरे तर आत्मा भिन्नच आहे, स्वतंत्र आहे. विशेषभावानेच हा अहंकार उत्पन्न झाला आहे आणि तोच कर्म बांधतो आणि तोच कर्म भोगतो. 'तुम्ही शुद्धात्मा आहात' पण बोलता की मी 'चंदुभाऊ आहे.' जिथे स्वतः नाही, तिथे आरोप करणे की 'मी आहे' त्यास अहंकार म्हणतात. परक्याच्या स्थानाला स्वत:चे स्थान मानता, हा ईगोइझम (अहंकार) आहे. हा अहंकार सुटला तर स्वत:च्या स्थानावर येऊ शकता. तेथे बंधन नाहीच. कर्म अनादिपासून आत्म्यासोबत प्रश्नकर्ता : तर आत्म्याची कर्मरहित अशी स्थिती असेल ना? ती केव्हा असते? दादाश्री : ज्याला एकाही संयोगाची वळगणां (बंधन, वेढा) नसेल, त्याला कर्म कधीही चिकटत नाहीत, ज्याला कोणत्याही प्रकारची वळगणां नसेल त्याला कर्माचा असा कोणत्याही प्रकारचा हिशोब नाही की जेणे करुन त्याला कर्म चिकटतील. सध्या सिद्धगतीत जे सिद्ध भगवंत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्म चिकटत नाही. वेढा संपला की चिकटत नाही. हे तर संसारात बंधन उभे राहिले आहे. आणि अनादी काळापासून हे कर्माचे बंधन आहे. आणि ते सर्व सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्समुळे आहे. सर्व तत्त्वं गतिमान होत असतात व तत्त्वं गतिमान झाल्यानेच हे सर्व उभे झाले आहे. ही सर्व भ्रांति उत्पन्न झाली आहे. त्यामुळे हे सर्व विशेषभाव उत्पन्न झाले आहेत. भ्रांती म्हणजेच विशेषभाव. त्याचा जो मूळ स्वभाव होता, त्यापेक्षा विशेषभाव उत्पन्न झाला आणि त्यामुळे हा सर्व बदल झाला आहे. अर्थात् आधी आत्मा कर्मरहीत होता, असे कधीच झालेले नाही. जेव्हा तो ज्ञानी पुरुषाकडे येतो, तेव्हा त्याचे कर्माचे ओझे

Loading...

Page Navigation
1 ... 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94