________________
कर्माचे विज्ञान
५१
कर्माचे फळ आहे. पण तिच व्यक्ती मला त्रास देते, म्हणजे त्यांनी मागच्या जन्मात माझ्यासोबत असा काही हिशोब बांधला असेल, म्हणून तोच मला त्रास देतो, असे काही आहे का?
दादाश्री : हो, आहे ना, सर्व हिशोब आहे. जेवढा हिशोब असेल तेवढया वेळा दुःख देईल. दोनचा हिशोब असेल तर दोन वेळा दु:ख देईल, तीनचा हिशोब असेल तर तीन वेळा देईल. ही मिरची दुःख नाही का देत?
प्रश्नकर्ता : हो, देते ना.
दादाश्री : तोंडाची आग-आग होते, नाही का? असे आहे हे सर्व. तो स्वतः त्रास देत नाही, पुद्गल देत आहे आणि आपण असे समजतो की तो देत आहे, तो पुन्हा, गुन्हा आहे.पुद्गल दुःख देतो. मिरची दुःख देते, तेव्हा मग कुठे टाकून देता का तिला?
मिरची एखादया दिवशी दुःख देते तेव्हा आपण समजून जायचे की भाऊ यात दोष दुःखी होणाऱ्याचा आहे. मिरची तर तिच्या स्वभावातच आहे.
प्रश्नकर्ता : आपण पण कोणाला त्रास दिला आणि त्याला दुःख झाले, तर काय करावे?
दादाश्री : आपल्याला प्रतिक्रमण करावे लागते. कपडे तर स्वच्छ ठेवावे लागतील ना! मळवायचे कशाला!
सर्वात उत्तम वर्तन, कोणाला किंचितमात्र पण दु:ख होणार नाही असे असायला हवे. तर आता दुःख होत आहे, त्याचे जर आपण प्रतिक्रमण केले तर अंतिम दशा येईल.
कोणी कोणाचे दुःख घेऊ शकतो? प्रश्नकर्ता : एक महान संत दोन वर्षांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये खूप वेदना भोगत होते. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला असे का होत आहे? तर ते म्हणाले की मी खूप लोकांची दु:खं घेतलेली आहेत. म्हणून मला असे होत आहे. असे कोणी करू शकतो का?