________________
कर्माचे विज्ञान
रस्त्यातून आपले शंभर डॉलर पळवणारा, सर्वच निमित्त आहेत. तुमचाच हिशोब आहे. तुम्हाला हे पहिल्या नंबरचे बक्षिस कुठून मिळाले? ह्यांना का मिळत नाही? शंभर डॉलर पळवून नेले, त्यास बक्षिस नाही म्हटले जाणार का?
कर्म भोगण्यात, प्रार्थनेचे महत्व प्रश्नकर्ता : दादा, मला असे विचारायचे आहे की जे प्रारब्ध बनून तयार झाले आहे की, कोणी आजारी पडणार आहे किंवा कोणाचे काही नुकसान होणार आहे, तर प्रार्थनेने ते बदलू शकते का?
दादाश्री : असे आहे की, प्रारब्धाचे भाग आहे, प्रारब्धाचे प्रकार असतात. एक प्रकार असा असतो की तो प्रार्थना केल्याने उडून जातो. दुसरा प्रकार असा आहे की तुम्ही जर साधारण पुरूषार्थ केला तर तो उडून जातो, आणि तिसरा प्रकार असा आहे की तुम्ही वाटेल तो पुरुषार्थ केला तरी तो भोगल्याशिवाय सुटकाच होत नाही. खूप चिकट असतो. जसे एखादा माणूस आपल्या कपड्यावर थुकला, त्यास असे धुवायला गेलो आणि ते डाग जर साधे असेल तर पाणी टाकल्यावर धुतले जाईल. परंतु तेच खूप चिकट असेल तर?
प्रश्नकर्ता : निघत नाही.
दादाश्री : अशाच प्रकारे कर्मही चिकट असतात. त्यांना निकाचित कर्म म्हटले आहे.
प्रश्नकर्ता : पण कर्म खूपच चिकट असेल तर प्रार्थनेने त्यावर काहीही फेरफार होत नाही का?
दादाश्री : काहीही बदल होत नाही. पण प्रार्थनेने त्यावेळी सुख वाटते.
प्रश्नकर्ता : भोगण्यासाठी शक्ति मिळते?
दादाश्री : नाही, हे जे तुम्हाला दु:ख आले आहे ना! प्रार्थनेमुळे दु:खात सुखाचा भाग वाटतो. पण प्रार्थना राहू शकेल, हे कठीण आहे. संयोग