Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 86
________________ कर्माचे विज्ञान खराब असतील आणि मन जेव्हा बिघडलेले असते त्यावेळी प्रार्थना राहणे कठीण आहे. तेव्हा जर प्रार्थना राहिली तर अति उत्तम म्हटले जाईल. त्यावेळी दादा भगवानांसारख्यांना आठवून बोलवले, की जे स्वतः शरीरात रहात नाही, शरीराचे मालक होत नाहीत, त्यांना जर आठवून बोलावले तर राहू शकते, नाहीतर राहणार नाही. प्रश्नकर्ता : नाहीतर त्या संयोगात प्रार्थना आठवतच नाही? ७३ दादाश्री : आठवणच येत नाही. आठवणच उडवून देते, सगळे भानच हरपून जाते. देवी- देवतांच्या नवसाचे बंधन प्रश्नकर्ता : कोणत्याही देवी-देवतांजवळ नवस केल्याने कर्मबंधन होते का? दादाश्री : नवस केल्याने कर्मबंधन अवश्य होते. नवस म्हणजे काय की आपण त्यांची मेहरबानी मागितली. म्हणून ते मेहरबानी करतातही, म्हणून तुम्ही त्यांना त्याच्या बदल्यात काहीतरी देतात आणि त्यामुळेच कर्म बांधले जाते. प्रश्नकर्ता : संत पुरूषाच्या सहवासाने कर्मबंधन सुटतात का ? दादाश्री : कर्मबंधन कमी होतात आणि पुण्याचे कर्म बांधले जातात पण ते त्याला नुकसान करत नाही. पापाचे बंधन बांधले जात नाही. जागृती कर्मबंधनाच्या समोर... प्रश्नकर्ता : कर्म बांधले जाणार नाही यासाठी उपाय कोणता ? दादाश्री : हे सांगितले ना, लगेच भगवंताला असे सांगून द्यावे, की अरेरे! मी असे-असे खराब विचार केले. आता हे जे पाहुणे आले आहेत ते तर त्यांचा हिशोब असेल तोपर्यंत राहतील. पण ' हे आता कुठून आले, मेले!' असे मला वाटले म्हणून मी तो हिशोब बांधला. त्याची मी क्षमा मागतो, पुन्हा असे करणार नाही.

Loading...

Page Navigation
1 ... 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94