Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 67
________________ ५४ कर्माचे विज्ञान प्रश्नकर्ता : अर्थात् दुसऱ्यांच्या शरीराशी केलेल्या छेडखानीचे पडसाद उमटतात का? दादाश्री : होय. तेच, कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख देणे, हे तुमच्याच शरीरावर येईल. प्रश्नकर्ता : म्हणजे त्याने जेव्हा हे सर्व केले असेल, जीवांना चिरले असेल तेव्हा तर तो अज्ञान दशेत असेल ना! त्यावेळी त्याला असा वैरभाव पण नसेल, तरी सुद्धा त्याला भोगावे लागेल? दादाश्री : चुकून, अज्ञान दशेत आगीत हात पडला ना, तर आग फळ देतेच. म्हणजे कोणीच सोडत नाही. अज्ञान की सज्ञान, जाणतेपणात किंवा अजाणतेपणात, भोगण्याची पद्धत वेगळी असते, परंतु सोडत वगैरे काही नाही! ही सर्व माणसं, जी दुःख भोगत आहेत, तो त्यांचा स्वत:चाच हिशोब आहे सर्व. म्हणून भगवंतांने म्हटले आहे की मन-वचन कायेने अहिंसेचे पालन कर. कोणत्याही जीवाला किंचितमात्र दुःख होणार नाही, असे कर. जर तुला सुखी व्हायचे असेल तर! प्रश्नकर्ता : कोणी महात्मा असेल तर त्याने डॉक्टर बनू नये का? दादाश्री : बनले पाहिजे की नाही बनले पाहिजे, ही वेगळी गोष्ट आहे. ते तर त्याच्या प्रकृती अनुसार होतच राहील. बाकी, मनात असा भाव असायला हवा. म्हणजे मग डॉक्टरच्या लाईनमध्ये तो जाऊच शकणार नाही. कोणाला किंचितमात्र दुःख होऊ नये असा ज्याचा भाव आहे, तो मग बेडकाला का मारेल? प्रश्नकर्ता : दुसऱ्या बाजूला डॉक्टरकी शिकून हजारो लोकांचे रोग दूर करून फायदा पण करतो ना? दादाश्री : तो जगाचा व्यवहार आहे. त्याला फायदा म्हणत नाही. मंद बुद्धीवाल्यांना कर्म बंधन कशाप्रकारे? प्रश्नकर्ता : जो चांगला माणूस असेल, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात, एका मिनिटात कितीतरी विचार करून टाकतो. कर्म

Loading...

Page Navigation
1 ... 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94