________________
५८
कर्माचे विज्ञान
असतील त्याप्रमाणे जन्म मिळतो. सध्या लोक पाशवते समान कर्म करत आहेत का?
प्रश्नकर्ता : सध्या तर पुष्कळ लोक पाशवी कर्मच करत आहेत ना!
दादाश्री : तर तिथली टिकिट मिळाली आहे, रिझर्वेशन झालेले आहे. म्हणजे भेसळ करत असेल, बिनहक्काचे खात असेल, उप भोगत असेल, खोटे बोलत असेल, चोऱ्या करत असेल, या सर्वांची निंदा करण्यात अर्थच काय आहे? ती त्यांची टिकीटे त्यांना मिळाली आहेत!
चार गतित भटकंती प्रश्नकर्ता : हे मनुष्य खालच्या योनित जातात खरे?
दादाश्री : मनुष्यातून नंतर तो 'देव' मध्ये, सर्वात मोठा देव बनून उभा राहतो, ह्या जगात टॉपमोस्ट. आणि नीच योनि म्हणजे कशी नीच योनि? घृणास्पद योनित जातो. त्याचे नाव ऐकताच घृणा उत्पन्न होते.
माणूस, मनुष्य जन्मातच कर्म बांधू शकतो. बाकी दुसऱ्या कोणत्याही जन्मात कर्म बांधत नाही. दुसऱ्या सर्व जन्मात तो कर्म भोगतो आणि या मनुष्य जन्मात कर्म बांधतोही खरे आणि भोगतोही खरे, दोन्हीही होतात. मागील कर्म भोगत जातो आणि नवे कर्म बांधत असतो. म्हणजे इथून चार गतित भटकायचे. इथूनच जावे लागते. ह्या गायी-म्हशी हे जे सर्व प्राणी दिसतात, हे देवलोक, त्यांनी फक्त कर्म भोगायचे, त्यांना कर्म करण्याचा अधिकार नसतो.
प्रश्नकर्ता : परंतु अधिकांश मनुष्याचे कर्म तर चांगले नसतातच ना?
दादाश्री : हे तर कलियुग आहे, दुषमकाळ आहे. म्हणून बहुतेक कर्म खराबच होत असतात.
प्रश्नकर्ता : म्हणजे येथे नवीन कर्म बांधले जाणारच ना?
दादाश्री : रात्रं दिवस बांधले जात आहेत. जुने भोगत जातो आणि नवीन बांधत जातो.