________________
कर्माचे विज्ञान
हॉटेलात जाण्याचे सर्व संयोग एकत्र होतात. त्यामुळे आता सुटायचे असेल तरी सुटू शकत नाही. त्याच्या मनात येते की, अरे ! असं का बरं होत असेल?
३५
तेव्हा येथील भ्रांतिवाल्यांना असे वाटते की, हे काम केले म्हणून हे झाले. भ्रांतिवाले असे समजतात की इथेच कर्म बांधतो आणि इथेच भोगतो. ते असे समजतात. पण ह्याचा शोध घेतला नाही की, त्याला जायचे नसूनही तो कसे बरे जातो? त्याला तर जायचे नसते तरी कोणत्या नियमानुसार तो जातो, तो तर हिशोब आहे.
तर आम्ही अजून अधिक शिकवतो की विनाकारण ह्या मुलांना सारखे मारू नका, ती मुले पुन्हा तसे भाव करणार नाहीत, असे करा. पुन्हा योजना आखणार नाही असे करा. चोरी करणे वाईट आहे... हॉटेलात खाणे हे वाईट आहे... असे ज्ञान त्याला उत्पन्न होईल असे करा. म्हणजे पुढच्या जन्मात पुन्हा असे होणार नाही. हे तर मुलांना मारत च राहतात आणि मुलांना सांगतात, 'बघ हं ! तुला जायचे नाही', तेव्हा त्याचे मन उलटे फिरते की, त्यांना बोलू दे, पण मी तर जाणारच, बस. उलट तो हट्टाला पेटतो आणि त्यामुळेच तर ही उलटी कर्म बांधली जातात ना! आई - वडीलच उलटे
करायला भाग पाडतात.
प्रश्नकर्ता : पूर्वी भाव केले होते म्हणून तो हॉटेलात गेला, आता हॉटेलात गेला, मग तेथे खाल्ले आणि नंतर पोटात मुरड पडली, हे सर्व डिस्चार्ज आहे?
दादाश्री : तो हॉटेलात गेला हे डिस्चार्ज आहे आणि पोटात मुरड पडली तेही डिस्चार्ज आहे. डिस्चार्ज स्वत:च्या ताब्यात राहत नाही, कंट्रोल राहत नाही. आऊट ऑफ कंट्रोल होते.
एक्झेक्ट कर्माची थिअरी कशाला म्हणतात हे जर समजले, तर तो माणूस पुरूषार्थ धर्माला समजू शकेल. जगातील लोक ज्याला कर्म म्हणतात, त्यास कर्माची थिअरी, कर्मफळ असे म्हणतात. हॉटेलमध्ये खाण्याचा भाव होतो. मागील जन्मी कर्म बांधले होते, त्या आधारावर खातो. म्हणजे तिथे