________________
४८
कर्माचे विज्ञान
जर आवडत असेल तर अजून दोन-पाच शिव्या द्या आणि जर आवडत नसेल तर देऊ नका, नाही तर तो जेव्हा परत करेल तेव्हा सहन होणार नाही. म्हणून तो जे काही देईल ते जमा करून घ्यावे.
ह्या जगात अन्याय होत नाही. अगदी एक क्षणभर सुद्धा न्यायाच्या बाहेर हे जग गेले नाही. म्हणून तुम्ही जर पद्धतशीर रहाल तर तुमचे कोणी नाव घेणार नाही. हो, कोणी दोन शिव्या देण्यासाठी आले, तर घ्याव्या आणि घेऊन जमा करून टाकायच्या आणि सांगायचे की हा हिशोब पूर्ण झाला.
क्लेश, ते नाही उदयकर्म जाणले कोणास म्हटले जाईल, तर घरात मतभेद होत नाही, मनभेद होत नाही, क्लेश-कलह (भांडण-तंटे) होत नाहीत. हे तर महिन्यात एखाद्या दिवशी भांडण होते की नाही होत घरात? मग यास जीवन कसे म्हणावे? यापेक्षा तर आदिवासी चांगल्या प्रकारे जीवन जगतात.
प्रश्नकर्ता : पण उदयकर्माच्या आधीन असेल, तर क्लेश-कलह होणारच ना?
दादाश्री : नाही, क्लेश उदयकर्माच्या आधीन नाही. पण अज्ञानामुळे होत असतात. क्लेश झाल्याने नवे कर्मबीज पडतात. उदयकर्म क्लेशवाले नसतात. अज्ञानतेमुळे स्वत:ला येथे कसे वागायचे, ते समजत नसल्यामुळे क्लेश होत असते.
माझा एक खास मित्र असेल, तो मरण पावला अशी बातमी जर कोणी मला येथे आणून दिली, तर लगेचच हे काय झाले, ज्ञानाने मला त्याचे पृथ:करण होऊन जाते, म्हणून मग मला क्लेश होण्याचे काही कारणच रहात नाही ना! हे तर अज्ञान गोंधळात घालते की माझा मित्र मरून गेला, आणि तेच सर्व क्लेश करवते!
अर्थात क्लेश म्हणजे अज्ञानता. अज्ञानतेने सर्व क्लेश निर्माण होतात. अज्ञानता गेली तर क्लेश बंद होतात.
हे सर्व काय आहे, हे जाणून घ्यायला हवे. साधारणपणे आपल्या