________________
४४
कर्माचे विज्ञान
जमवा सासूसोबत सुमेळ प्रश्नकर्ता : सासूसोबत माझा खूप संघर्ष होत असतो. त्यापासून कसे
सुटायचे?
दादाश्री : एकूण एक कर्माची मुक्ति व्हायला हवी. सासू त्रास देत असेल तेव्हा प्रत्येक वेळी कर्मापासून मुक्ति मिळाली पाहिजे. तर त्यासाठी आपण काय केले पाहिजे? सासूला निर्दोष पाहिले पाहिजे, की यात सासूचा काय दोष? माझ्या कर्माच्या उदयामुळे त्या मला भेटल्या आहेत. त्या बिचाऱ्या तर निमित्त आहेत. तर त्या कर्माची मुक्ति झाली, आणि जर सासूचे दोष पाहिले म्हणजे कर्म वाढले, त्यात मग कोण काय करु शकेल? जर समोरच्याचे दोष दिसले तर कर्म बांधली जातात आणि स्वत:चे दोष दिसले तर कर्म सुटतात
__ आपले कर्म बांधले जाणार नाही अशाप्रकारे आपण रहावे. या जगापासून दूर रहावे. हे कर्म बांधले गेले होते म्हणून तर एकत्र जमले आहेत. आपल्या घरात एकत्र कोण जमले आहेत? ज्यांच्यासोबत कर्माचा हिशोब बांधला गेला आहे तेच सर्व एकत्र जमलेले आहेत. आणि मग ते आपल्याला बांधून मारतात सुद्धा! आपण नक्की केलेले असेल की मला त्याच्यासोबत बोलायचे नाही. तरीही समोरची व्यक्ति तोंडात बोटं घालून बोलायला भाग पाडते. अरे, बोटं घालून कशासाठी बोलायला लावतो? याचेच नाव वैर! सर्व मागील वैर! असे कुठेतरी पाहिले आहेस का?
प्रश्नकर्ता : सर्व ठिकाणी तेच पहावयास मिळते ना!
दादाश्री : म्हणूनच मी सांगितले ना की, तिथून बाजूला व्हा आणि माझ्याजवळ या. हे जे मी प्राप्त केले आहे ते मी तुम्हाला देईल, तुमचे (मोक्षचे) काम होऊन जाईल, आणि सुटका होईल. नाहीतर सुटका होणे शक्य नाही.
__ आम्ही कोणाचे दोष काढत नाही, पण नोंद घेतो की, पहा हे जग काय आहे? सर्व प्रकारे मी या जगाला पाहिले, खूप प्रकारे पाहिले. कोणी दोषीत दिसते ही अजून आपली चुक आहे. कधी ना कधी तर निर्दोष