Book Title: Karmache Vignan
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 44
________________ कर्माचे विज्ञान राग येणे हे स्थूळकर्म आहे, आणि राग आला त्यात आजचा तुझा भाव काय आहे की रागावलेच पाहिजे. तर तो पुढच्या जन्माचा पुन्हा रागाचा हिशोब आहे आणि तुझा आजचा भाव आहे की रागवले नाही पाहिजे. तुझ्या मनात नक्की असेल की रागवायला नकोच, तरी सुद्धा रागावले जात असेल तर तुला पुढील जन्मासाठी बंधन राहिले नाही. ३१ या स्थूळकर्मात तुला राग आला, तर त्याचा तुला या जन्मात मार खावा लागेल. तरी सुद्धा तुला बंधन होणार नाही. कारण सुक्ष्मकर्मात तुझा निश्चय आहे की रागवायला नकोच आणि कोणी माणूस कोणावरही रागवत नसेल, परंतु मनात बोलत असेल की ह्या लोकांवर रागावले तरच सरळ होतील अशी ही माणसं आहेत. त्यामुळे तो पुढच्या जन्मात पुन्हा रागीट बनतो ! अर्थात बाहेर जो क्रोध करतो, ते स्थूळकर्म आहे आणि त्यावेळी आत जे भाव होतात, ते सुक्ष्मकर्म आहे. हे जर समजले तर स्थूळकर्माला काहीही बंधन राहणार नाही! म्हणून हे सायन्स मी नव्या पद्धतीने समोर ठेवले आहे. आतापर्यंत स्थूळकर्माने बंधन आहे अशी मान्यता जगातील लोकांच्या डोक्यात ठासून बसवली गेली आहे आणि त्यामुळे लोक सारखे घाबरत राहतात. या ज्ञानाने संसारासहित मोक्ष आता घरात बायको असेल, लग्न केलेले असेल आणि मोक्षाला जायचे असेल, तर मनात येत राहते की मी लग्न केलेले आहे, तर आता मी मोक्षाला कसे काय जाऊ शकेल? अरे बाबा, बायको नडत नाही, तुझी सुक्ष्मकर्म नडतात. हे तुझे स्थूळकर्म जरा सुद्धा नडत नाही. हे मी उघड करून दिले आहे आणि हे विज्ञान खुले केले नसते, तर आत भीती, भीती आणि भीतीच वाटत राहिली असती. आत सतत अजंपो (बेचैनी, अशांती) राहते. ते साधू म्हणतात की आम्ही मोक्षाला जाऊ. अरे, तुम्ही मोक्षाला कसे काय जाणार आहात? काय सोडले पाहिजे, ते तर तुम्हाला माहित नाही. तुम्ही तर स्थूळ सोडले. डोळ्यांनी दिसते, कानांना ऐकू येते ते सोडले. त्याचे फळ तर या जन्मातच मिळेल. हे विज्ञान नवीनच प्रकारचे आहे, हे तर अक्रम विज्ञान आहे. ज्यामुळे या लोकांना सर्व प्रकारची फेसीलिटी

Loading...

Page Navigation
1 ... 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94