________________
कर्माचे विज्ञान
१५
प्रश्नकर्ता : तर पाच इन्द्रियांनी जे होते तो सर्व इफेक्ट आहे का?
दादाश्री : हो, ते सर्व इफेक्ट आहे. संपूर्ण आयुष्यच इफेक्ट आहे. आणि त्यात आत जे भाव होत असतात ते भाव कॉझ आहे आणि भावाचा कर्ता असला पाहिजे. जगातील लोक, ते तर कर्ता आहेतच.
कर्म बांधण्याचे थांबले म्हणजे पूर्ण झाले. हे तुम्हाला समजते आहे का? तुमचे कर्म बांधण्याचे थांबले जात असेल? असे कधी तरी पाहिले का? शुभमध्ये पडाल तर शुभ बांधले जाईल, नाही तर अशुभ तर असतेच. कर्म सोडतच नाही! आणि 'स्वतः कोण आहे, हे सर्व कोण करतो' हे जाणून घेतल्यानंतर कर्म बांधले जाणारच नाही ना !
पहिले कर्म कशाप्रकारे आले?
प्रश्नकर्ता : कर्माच्या थियरीनुसार कर्म बांधली जातात आणि त्याचा परिणाम नंतर भोगावा लागतो. आताच तुम्ही अशाप्रकारे कॉझ आणि इफेक्ट बद्दल सांगितले. जर आधी कॉझ नंतर त्याची इफेक्ट असते हे जर आपण तर्कदृष्टीने विचार केला आणि मागे मागे जात राहिलो तर असा प्रश्न पडतो की, सर्वात प्रथम कॉझ कशाप्रकारे आले असेल?
दादाश्री : अनादित प्रथम असे काही नसते ना ! ही गोलाकार माळ पाहिली आहे का तुम्ही? हे सुर्यनारायण फिरतात तर त्याची सुरूवात कुठून करत असतील?
प्रश्नकर्ता : त्यांची सुरूवातच नाही.
दादाश्री : म्हणजे ह्या जगाची सुरूवात कोणत्याही जागी झालेली नाही. पूर्ण गोलच आहे. राउन्डच आहे. पण यातून सुटका आहे. याची बिगिनिंग (सुरुवात) नाही ! आत्मा आहे म्हणून सुटका होऊ शकते. परंतु त्याची बिगिनिंग नाही. सर्वच गोल आहे, प्रत्येक गोष्ट गोल आहे. कोणतीही गोष्ट चौकोनी नाही. चौकोन असेल तर त्याला आपण म्हणू शकलो असतो की ह्या कोपऱ्यापासून सुरूवात झाली आहे आणि ह्या कोपऱ्याला ती संपते. गोल आकारात तर कोपरा नसतोच ? संपूर्ण जगच गोल आहे, यात बुद्धि काम करू शकेल अशी नाही. म्हणून बुद्धिला