________________
झाली आहे, अशा ज्ञानींची ही वाणी वाचकास अवश्य निर्दोष दृष्टीची 'समज' प्राप्त करविणारच !
दुसऱ्यांचे दोष पाहिल्याने, दोषित दृष्टीने संसार टिकून राहीला आहे आणि निर्दोष दृष्टीने संसाराचा अंत येतो! स्वतः संपूर्ण निर्दोष होतो. निर्दोष स्थिती कशी प्राप्त करावी ? तर दुसऱ्यांचे नाही पण स्वत:चेच दोष पाहिल्याने. स्वतःचे दोष कशा प्रकारचे असतात, त्यासंबंधी असलेली सूक्ष्म समज इथे दर्शनास येते. खूपच बारीक-बारीक दोष दृष्टीस उघड करुन निर्दोष दृष्टी बनविण्याची परम पूज्य दादाश्रींची कला येथे सूज्ञ वाचकास जीवनात खूप उपयोगी पडेल अशी आहे.
निमित्ताच्या आधीन, संयोग, क्षेत्र, काळाच्या आधीन निघालेल्या वाणीच्या या प्रस्तुत संकलनात भासित क्षति रुपी दोषांना, क्षम्य मानून, त्यासाठी सुद्धा निर्दोष दृष्टी ठेऊन, मुक्तिमार्गाच्या पुरुषार्थाचा प्रारंभ करुन संपूर्ण निर्दोष दृष्टी प्राप्त व्हावी, हीच अभ्यर्थना ! !
- डॉ. नीरूबहन अमीनचे जय सच्चिदानंद.
९