Book Title: Trimantra Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 24
________________ त्रिमंत्र 15 प्रश्नकर्ता : परंतु या आचार्यांच्या ज्या काही कृती आहेत, त्या मागच्या महापुरुषांचे 'आगम' असतील किंवा वेदांताची सुत्रे असतील, त्याच्यावरतीच त्यांची मोहोर आहे. त्यांनाच आचार्य म्हटले आहे. दादाश्री : ते तर म्हणतील, परंतु खरे आचार्य तर आत्मज्ञान झाल्यानंतरच म्हटले जातात. आचार्य, प्रतापी सिंहा सारखे तीर्थंकर आमच्या कोणत्या कामास येतात ? दर्शनाच्या कामी येतात आणि ऐकण्याच्या कामी येतात ! ऐकणे केव्हा जेव्हा देशना देत असतात तेव्हा ऐकण्याच्या कामी येतात, नाहीतर दर्शनाच्या कामी येतात. ते सुद्धा, ज्यांना फक्त दर्शनाचीच त्रुटी राहिली आहे, ते त्यांचे दर्शन घेऊन मोक्षास जातात. त्यांच्या दर्शनानेच पूर्णाहुति प्राप्त होते, परंतु जो कोणी त्या स्टेजपर्यंत पोहोचला असेल त्याच्यासाठीच फक्त. ज्याने आचार्यांकडून सर्व आचार जाणून घेतलेत, म्हणजेच त्या स्टेजपर्यंत आला आहे ना, त्याचे तेथे तीर्थंकर भगवानांच्या दर्शनाने काम होते. अर्थात शेवटची परिपक्वता आचार्यांपाशीच होते, कारण आचार्य परिपक्व असतात. तीर्थंकर सुद्धा त्यांच्या म्हत्तेचा स्वीकार करतात. तीर्थंकर भगवानांना जर विचारले की ' या पाचमध्ये सर्वात मोठा कोण' ? तर तीर्थंकर भगवंत म्हणतील की, 'आचार्य भगवंत मोठे.' हे तर तीर्थंकर भगवंताकडून अभिप्राय मागितले तेव्हा अभिप्राय तर त्यांचाच म्हणावा लागेल ना ! प्रश्नकर्ता: परंतु असे का म्हणतील ? दादाश्री : कारण तीर्थंकर भगवंतांमध्ये एकशे आठ गुण असतात ! आणि आचार्य महाराजात एक हजार आठ गुण असतात. अर्थात ते तर गुणांचे धाम समजले जातात ! आणि ते सिंहासारखे असतात. त्यांच्या डरकाळीमुळे सर्वजण कापतात. जसे कोल्ह्याने मांस खाल्ले असेल,

Loading...

Page Navigation
1 ... 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58