Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(२९)
भिव्यंजक; मृत्पिण्डापासून घागर बनविण्यासाठी लागणाऱ्या चक्र दंडादि साधनांना उत्पादक कारणे मणतात. या साधनापासून जी घागर मातीच्या गोळ्यापासून बनली ती ती साधने मिळण्यापूर्वी अस्तित्वात नव्हती. यासाठी घागर बनविणाया या साधनास उत्पादक कारण किंवा कारक असें मणतात. अमिव्यंजक कारण त्यास ह्मणतात की, भिन्नकारणापासून उत्पन्न झालेल्या पदार्थांना उघड करून दाखविणे. जसे घागर अंधारामध्ये आहे व ती आपल्या कारणापासून उत्पन्न झाली आहे परंतु दिवा अंधाराचा नाश करून तिचे स्वरूप व्यक्त करतो यामुळे दिव्यास आपण अभिव्यंजक कारण ह्मणतो. अभिव्यंजक कारण पदार्थाना उत्पन्न करीत नाही, परंतु ते पदार्थ अंधार किंवा कपडा वगैरेनी आच्छादित असल्यास अभिव्यंजकाच्या साहायाने त्यांचे स्वरूप समजते हा या दोन कारणामध्ये फरक आहे. परंतु सर्वांना अभिव्यंजक कारणच मानले तर दिव्याप्रमाणे तीही लांब राहूनच घटादि कार्य उत्पन्न करतील. यासाठी सर्वथा मत्कार्यवाद योग्य नाही. हे दाखविण्यासाठी आचार्यांनी श्लोकांत ' अनित्यम् ' असा शब्द योजिला आहे. तसेच या श्लोकांत ' अत्राणम्' असा शब्द आला आहे, याचा अर्थ जगाचा कोणीही संरक्षक नाही असा होतो. कित्येक ईश्वर किंवा विष्णु या जगाचा कर्ता आहे असे अषतात. त्याचे खंडन करण्याच्या उद्देशाने आचार्यांनी हा शब्द योजिला आहे. परंतु ईश्वर हा जगाचा कर्ता होऊ शकत नाही कारण जगामध्ये जे अनेक वैचित्र्य आहे ते एका ईश्वराचे हातून उत्पन होऊ शकत नाही. तसेच ईश्वर दयाळू असल्यामुळे सर्व प्राण्यांना समान स्थितीत त्याने ठेवलें असतं, परंतु जगति एक श्रीमान् व एक दरिद्री, एक अल्पायु व एक
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org