Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
सजातीयता आहे; झणजे पुद्गलत्वाने ही सजातीय आहेत; परंतु जीव व पुद्गल ही दोन द्रव्ये वेगवेगळी आहेत; त्यामुळे येथे सजातीयता नसल्यामुळे ही परस्परांची स्वरूपें धारण करीत ना. हीत. परंतु या दोषांच्या संश्लेषाने रागद्वेषात्मक तिसरी अवस्था होते. रागद्वेष हे जीव व पुद्गल या दोघांची वैभाविक अवस्था आहे. रागद्वेष जीवाचा वैभाविक भाव आहे असें ज्यावेळेस आपण ह्मणतो त्यावेळेस त्या सांगण्यांत विवक्षात असते. अर्थात् जीवाच्या अंशांच्या अपेक्षेनें रागद्वेषांना जीवाचे भाव असें ह्मणतात. याचप्रमाणे पुद्गलांच्या अंशांच्या अपेक्षेनें रागद्वेषांना पौगलिकही ह्मणतात. व यामुळेच सिद्धामध्ये त्याचा अभाव दाखविला जातो. कारण, रागद्वेष कर्मकृत नसते तर ते जीवांच्या ज्ञानादिकगुणाप्रमाणे सदैव आत्म्यामध्ये राहिले असते व सिद्धावस्थेतही यांची सत्ता दिसून आली असती. यामुळे पुद्गल व जीव यांच्या निविड संबंधाने ही अवस्था उत्पन्न होते, व ही दोन द्रव्ये वेगळी झाली यांचे पृथकरण पूर्णपणे झाले. झणजे दोघांनाही शुद्धावस्था प्राप्त होते. ही शुद्धावस्थाच मोक्ष आहे. याप्रमाणे बन्ध व मोक्ष याचे स्वरूप आहे.
बौद्ध किंवा नैयायिक यांनाही बन्धमोक्षादिक तत्वे मानली आहेत. परंतु त्यांनी जीवादिक पदार्थ सर्वया आणिक किंवा नित्य मानले आहेत; त्यामुळे बन्धमोक्षादिकांची उपपत्ति सिद्ध होत नाही. सर्वथा क्षणिक पदार्थ मानल्यामुळे तो पदार्थ अनेक भगपर्यंत राहण्यास असमर्थ असतो. त्यामुळे जो बद्ध झाला होता तोच कर्ममुक्त झाला हे ह्मणणे युक्त होत नाही. अर्थात् बद्ध झालेला आत्मा वेगळा व मुक्त होणारा आत्मा थेगळा आहे, असे अणावे लागेल, अर्थात् एकाने चांगले किंवा वाईट कर्म केले असेल तर त्याचा भोक्ता तो न होता दुसराच
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org