Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( ८८ ).
हर्णे हे देखील ज्याचे समानच आहे अश देखील कित्येक मनुयांचे प्रयत्न सफल होतात व कित्येकांचे निष्फल होतात. यावरून देव है प्रबल आहे असे सिद्ध होते. व यांच्या योगानेंच सुखदुःखादि तज्जन्य फलामध्ये फरक दृष्टीस पडतो.
देवाच्या योगे सुखाखाची प्राप्ति होते हैं क्षणणे खोटें आहे. सुख किंवा दुःख हैं ईश्वर देत असतो. मनुष्य असमर्थ आहे. त्यामुळे तो सुखदुःखाचा कर्ता होऊ शकत नाहीं. संसारांत ठेवणे किंवा प्राण्यांना मोक्षाची प्राप्ति करून देणे हैं ईश्व राच्या स्वाधीन आहे जगांतील सर्व घडामोड शक्तिशाली ईश्वरावांचून दुसऱ्या कोणास करता येईल काय? ईश्वरच समर्थ आहे, दैव समर्थ नाहीं. हे झणणेही उचित नाहीं. संसारांतील जीं काय दिसून येतात ती सर्व ईश्वरनिमित्तकच आहेत हे सिद्ध होत नाहीं. त्याचप्रमाणे सुखदुःखाची प्राप्ति करून देणें हेंही ईश्वराच्या हातीं नाहीं. तसेच ईश्वराचा स्वभाव एक मानला आहे. यास्तव मिन देशामध्यें भिन्नकालामध्ये भिन्नकारण सामग्रीनी उत्पन्न होणारी कायें एक भावी ईश्वराच्या हातून कशी हो तील एका वेळेस भिन्न देशामध्ये अनेक कार्ये उत्पन्न होणार नाहीत. भिन्न भिन्न कालांत अनेक कार्ये उत्पन्न होतात ती ईश्वराचा एकच स्वभाव मानल्यास कक्षी उत्पन्न होतील. यासाठी ईश्वराचे ठिकाणी अनेक स्वभाव मानावें लागतील. त्याचप्रमाणे कित्येक प्राण्यांस नरकामध्यें तो लोटतो. कित्येक प्राण्य स दरिद्री करतो. कित्येक प्राण्यांना अनिष्ट पदा प्राप्ति करून देतो. असें मानल्यास तो निदयी आहे असें मानावे लागेल.
कदाचित् प्रत्येक प्राण्याचे जसे अदृष्ट असेल त्यस अनुसरून ईश्वर त्यास सुख किंवा दुःख देतो, यामुळे तो निर्दयी नाहीं,
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org