Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(४५) आत्म्यापासून भिन्न असून देखील त्यांच्यावर मिथ्या ममत्वबुद्धि उत्पन्न होते. व यौवन, धनादिक क्षणिक पदार्थामध्ये हे स्थिर आहेत असें मिथ्याज्ञान होते. यामुळे हे जग भ्रान्त झाले होते, मूढ झाले होते. परन्तु भगवान अभिनन्दन जिनाने : दयेनें प्रेरित होऊन सत्य तत्वाचा या जगाला उपदेश केला.. खरा मार्ग जगास दाखऊन दिला. व भगवान् अभिनन्दनाने जगाचा उद्धार केला.
भावार्थः-कावीळ रोग झालेल्या मनुष्यास सगळे पदार्थ पिवळे दिसतात. किंवा धोतरा ज्याने खाल्ला आहे अशा मनुप्यास चोहोंकडे सोनेच सोने दिसूं लागतं. तद्वत् मिथ्या ज्ञानाच्या योगाने पदार्थाचे वास्तविक ज्ञान होत नाहीत. त्यामुळे आपल्यापासून स्वरूपाने भिन्न असलेल्या शरीर, स्त्रीपुत्रादि पदार्थामध्ये आपलेपणा उत्पन्न होतो. परन्तु विचार केला असतां ते आपल्यापासून भिन्न आहेत त्यामध्ये आपलेपणाची कल्पना चुकीची आहे. कारण, आत्म्याचे जे ज्ञानदर्शनादिक गुण आहेत त्यामध्ये आत्मकल्पना होणे योग्य आहे. कारण, आत्म्यांशी त्यांचा अविनाभाव सम्बन्ध आहे. त्यांचा कधीच वियोग होत नाही. आणि शरीरादिक बाह्य पदार्थ आत्म्यापासून वियुक्त होतात; यामुळे त्यांच्यामध्ये ममत्वकल्पना चुकीची आहे. त्याचप्रमाणे कर्मजन्य जो उपाधिमा जीवास प्राप्त होतो त्याने जीवाच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होतो त्यायोगें, मी राजा आहे, मी श्रीमान् आहे, मी गोरा आहे अशी कल्पना उत्पन्न होते. तेव्हा हे सर्व मिथ्याज्ञान आहे. ममत्व व अहंकार यांची लक्षणे नागसेन आचार्यानी अशी सांगितली आहेत.
शश्वदनात्मीयेषु स्वतनुप्रमुखेषु कर्मजनितेषु । आत्मीयाभिनिवेशो ममकारो मम यथा देहः ॥ १॥
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org