Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
( ३४ )
दन केलेल्या मतांमध्येच होते. झणजे जो आत्मा पूर्वी कर्मबद्ध होता तोच मज होतो व त्यास मोक्षफल प्राप्त होते. झणजे अनंत ज्ञानादि गुणांनी परिपूर्ण तो होतो. अन्य मतामध्ये या तत्वांची सिद्धि होत नाही..
सर्व पदार्थ क्षणिक आहेत असें बौद्ध मणतात, त्यामुळे त्यांच्या मतांत बन्ध मोक्षादिक तत्वांची सिद्धि होत नाही. जीव सर्वथा क्षणिक आहे असे मानले तर ज्याला कर्माचाबन्ध झाला आहे तो दुसऱ्या क्षणी नाश पावतो त्यामुळे कर्माचे फल जें सुख किंवा दुःख याचा अनुभव त्याला कसचा येणार? तसेंच बन्ध एकाला होतो व दुसराच त्यापासून मुक्त होईल. कारण मोक्षप्राप्ति होईपर्यंत पहिल्या बद्ध जीवाचें अवस्थान नसल्यामुळे कर्मापासून सुटलेला जीव दुसराच आहे असे मानावें लागेल. बंध व मोक्ष या दोन तत्वांची सिद्धि होत नसल्यामुळे त्यांच्या कारणांची सिद्धि होणे लांबच राहते. ... जसे सर्वथा, क्षणिक पक्षामध्ये दोष येतो तसेच सर्वथा पदार्थाना नित्य मानणान्यांच्या मतांतही या तत्वांची सिद्धि होत नाही. कारण, जो आत्मा कर्मानी बांधला गेला तो सदैव बद्धच राहणार. त्याची कर्मापासून सुटका केव्हांच होणार नाही. जर कर्मापासून मुक्त झाला तर बन्धाचे नित्यत्व रहात नाही. बंध तत्व अनित्य आहे असें ह्मणावे लागेल. तात्पर्य ज्या पदार्थाची जी अवस्था आहे त्यांची ती अवस्था कायमची राहील. त्या अवस्थेत फेरबदल होणार नाही. ह्मणून मुक्तावस्था जी बन्धाचा अभाव झाल्याने प्राप्त होते ती होणार नाही, किंवा मुक्तावस्था देखील अनादिकालापासूनच जीवाची आहे. असें मानावे लागेल. व अनादिकालापान ती मुक्तावस्था जीवांची असल्यामुळे मुक्ति होण्याची जी कारणे शास्त्रांत वर्णिली.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org