________________
बाकी, यात प्रेमासारखे काहीच नाही. या संसारात प्रेम शोधूच नका. प्रेम कुठेही नसते. प्रेम तर ज्ञानी पुरुषांजवळ असते. इतर सर्व ठिकाणी तर प्रेम ओसरते आणि मग भांडणे होतात. भांडणे होतात की नाही? याला प्रेम म्हणत नाही. ती सर्व आसक्ती आहे. आसक्तीलाच जगातील लोक प्रेम म्हणतात. वेडेवाकडे बोलणे हाच धंदा! प्रेमाचा परिणाम म्हणजे कधी भांडण होतच नाही. प्रेम त्याचे नाव की कोणाचाही दोष दिसत नाही.
प्रेमात आयुष्यभरात कधीही मुलांचा दोष दिसत नाही, पत्नीचा दोष दिसत नाही, त्यास प्रेम म्हणावे. प्रेमात दोष दिसतच नाहीत आणि इथे तर लोकांना कितीतरी दोष दिसतात? 'तू अशी आणि तू तशी!' अरे, तू प्रेम म्हणत होतास ना? मग कुठे गेले ते प्रेम? म्हणजे हे प्रेमच नाही, दुनियेत कधी प्रेम असते का? एका केसा इकतेही प्रेम जगाने पाहिले नाही. ही तर निव्वळ आसक्तीच आहे.
आणि जिथे आसक्ती असेल तिथे आक्षेप झाल्याशिवाय राहतच नाही, आसक्तीचा हा स्वभावच आहे. आसक्ती झाली म्हणूनच आक्षेप करत राहतात ना, की तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात' 'तुम्ही असे आणि तू अशी' असे नाही बोलत, नाही का? तुमच्या गावी असे बोलतात की नाही बोलत? बोलतात!, तर ते आसक्तीमुळे. पण जिथे प्रेम आहे तिथे दोष दिसतच नाहीत.
संसारात या भांडणामुळेच आसक्ती होते. या संसारात भांडण तर आसक्तीचे विटामिन आहे. भांडण नसेल मग तर वीतराग होता येईल.
प्रेम तर वीतारागींचेच
या मुली नवरा पसंत करतात, सर्व प्रकारे बघून पसंत करतात, नंतर भांडत नसतील? भांडतात का? मग त्यास प्रेम म्हटलेच जाणार नाही ना! प्रेम तर कायमचेच असते. जेव्हा पाहाल तेव्हा तेच प्रेम, तसेच प्रेम दिसते. त्यास म्हणतात प्रेम. आणि तिथे आश्वासन घेता येते.
हे तर तुम्हाला तिच्यावर प्रेम वाटते आणि ती जर कधी रुसून