________________
आसक्ती, तोपर्यंत टेन्शन प्रश्नकर्ता : जितका जिव्हाळा जास्त, तितके त्याचे प्रेम अधिक आहे, अशी समज आहे.
दादाश्री : ते प्रेमच नसते ना! ती सर्व आसक्ती आहे. या जगात प्रेम हा शब्दच नाही. तेव्हा प्रेम बोलणे हे चुकीचे आहे. ती आत आसक्ती असते.
प्रश्नकर्ता : तर हा जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचा अतिरेक हे समजावण्याची कृपा करावी.
दादाश्री : जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचा अतिरेक यास इमोशनल (भावूकता) म्हटले जाते. मनुष्य मोशनमध्ये राहू शकत नाही, म्हणून इमोशनल होतो.
किंचितही जिव्हाळा आहे, आसक्ती आहे, तोपर्यंत माणसाला 'टेन्शन' उत्पन्न होते आणि टेन्शनमुळे चेहरा उतरलेला असतो. आमच्यात प्रेम आहे म्हणून तर आम्ही बिनटेन्शनचे राहू शकतो. दुसरा कोणी टेन्शनशिवाय राहूच शकत नाही! सर्वांनाच टेन्शन असते, संपूर्ण जग टेन्शनवालेच आहे.
जिव्हाळ्याचा प्रवाह ज्ञानींना आम्हा ज्ञानीपुरुषांना जिव्हाळा असतो. हो, जसा असायला हवा तसाच असतो. आम्ही त्यास 'होम' ला (आत्म्याला) शिवूही देत नाही. असा नियम नाही की आत 'होम मध्ये' शिवू द्यावे. जिव्हाळा नसेल तर त्याला मनुष्यच कसे म्हणाल?
प्रश्नकर्ता : आपण म्हणालात की जिव्हाळा तर आम्हालाही असतो. तुम्हाला जसा असतो त्यापेक्षा आमचा उच्च प्रकारचा असतो, सर्वांसाठीच असतो.
दादाश्री : जिव्हाळा तर असतो. आम्ही बिनजिव्हाळ्याचे नसतो.