________________
आपला धक्का समोरच्यास लागणार नाही इतके आपण पाहावे तेव्हाच प्रेम संपादन होते. बाकी, प्रेम संपादन करायचे असेल तर ते असेच होत नाही.
हळूहळू सर्वांसोबत शुद्ध प्रेम स्वरूप व्हायचे आहे. प्रश्नकर्ता : शुद्ध प्रेम स्वरूप म्हणजे नक्की कशाप्रकारे राहायचे?
दादाश्री : एखादी व्यक्ती आता शिव्या देऊन गेली आणि नंतर ती व्यक्ती तुमच्याजवळ आली तरी तुमचे प्रेम घटत नाही, त्याचे नाव शुद्ध प्रेम. अशा प्रेमाचा धडा शिकायचा आहे, बस. दुसरे काही शिकायचे नाही. मी जे दाखवितो असे प्रेम असायला हवे. हे जीवन पूर्ण होईपर्यंत असे होईल ना? तेव्हा आता प्रेम शिका!
रीत, प्रेम स्वरूप होण्याची मुळात जग जसे आहे तसे तो समजेल, नंतर अनुभव करेल तर तो प्रेमस्वरूपच होईल. जग ‘जसे आहे तसे' म्हणजे काय? तर कोणताही जीव किंचितमात्र दोषी नाही, जीवमात्र निर्दोषच आहे. कोणी दोषी दिसतो तो भ्रांतीमुळेच दिसतो.
चांगले दिसतात ती सुद्धा भ्रांती आणि दोषी दिसतात ती सुद्धा भ्रांती. दोन्ही अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट (आकर्षण-विकर्षण) आहेत. म्हणजे खरोखर तर कोणी दोषी नाहीच आणि दोषी दिसतो त्यामुळे प्रेम होतच नाही. या जगासोबत जेव्हा प्रेम होईल, जेव्हा जग निर्दोष दिसेल तेव्हा प्रेम उत्पन्न होईल. हे 'तुझे-माझे' कुठपर्यंत वाटत असते? तर जोपर्यंत दुसऱ्यांना परके मानतो तोपर्यंत. त्यांच्याशी भेद आहे तोपर्यंत हे माझे वाटतात. म्हणून या अटॅचमेंटवाल्यांना माझे मानतो आणि डिटॅचमेंटवाल्यांना परके मानतो, कोणाशीही प्रेमस्वरूप राहत नाही.
प्रेम हा परमात्म गुण आहे, म्हणूनच त्या प्रेमामुळे आपले सर्व दुःख विसरायला होतात. अर्थात प्रेमाने बांधले गेले म्हणजे मग दुसरे काही बांधण्याचे राहिले नाही.