________________
पति- पत्नीचा दिव्य व्यवहार
बातचीत करा ना! त्याने काही खुलासा होईल. हे तर योग आला आलो म्हणून एकत्र आलो, नाहीतर एकत्र आलो नसतो !! म्हणून काही बातचीत करा न! त्यात काय हरकत आहे ? आपण सर्व एकच आहोत. तुम्हाला वेगळेपण वाटते, कारण की भेदबुद्धि आहे त्यामुळे माणसांना वेगळेपणा वाटतो बाकी सर्व एकच आहोत. माणसांना भेदबुद्धि असते ना ! वाइफसोबत तर भेदबुद्धि होत नाही ना ?
प्रश्नकर्ता : हो, तिथेच होत असते!
दादाश्री : वाइफसोबत भेद कोण पाडतो ? तर बुद्धिच !
बायको आणि नवरा दोघे जेव्हा शेजाऱ्यांसोबत भांडतात तेव्हा कसे अभेद होऊन भांडतात ? दोघेजण असे हात करुन, तुम्ही असे आणि तुम्ही तसे. दोघेजण असे हात करतात. तेव्हा आपल्याला वाटते की, ओहोहो ! ह्या दोघात केवढी एकता ? ही कॉर्पोरेशन अभेद आहे, असे आपल्याला वाटते. आणि नंतर घरी जाऊन भांडतील तेव्हा काय बोलतील ? घरात दोघे भांडतात की नाही भांडत ? कधी तरी तर भांडत असतील की नाही ? हे कॉर्पोरेशन आतल्या आत जेव्हा भांडतील ना, तू अशी नी तुम्ही असे. तू अशी नी तुम्ही असे, मग घरात जोरदार भांडण होते ना ! तेव्हा तर सांगता तू जा, इथून जा, आपल्या घरी (माहेरी) जा, मला नकोच आहेस तू! आता हा गैरसमज नाही का? काय वाटते तुम्हाला ? त्यांच्यातली अभेदता तुटून गेली आणि भेद उत्पन्न झाला. अर्थात् पत्नीसोबतही तुझे-माझे होऊन जाते. तू अशी आहेस नी तू तशी आहेस! तेव्हा ती म्हणेल तुम्ही कुठे सरळ आहात ? अर्थात् घरात ही तू आणि मी होऊन जाते.
१७
मी आणि तू, मी आणि तू, मी आणि तू ! जे पहिले एक होते, आम्ही दोघे एक आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. आमचेच आहे हे, त्यातून तू आणि मी झाले. आता तू आणि मी झाले म्हणून ओढातान सुरु होते. ही ओढातान कुठपर्यंत पोहचते ? थेट हळदीघाटीची लढाई सुरु होते. सर्वनाशाला निमंत्रित करण्याचे साधन म्हणजे ही ओढातानी ! म्हणून ओढातानी तर कोणाबरोबरही होऊ देऊ नका.
रोज माझी वाइफ, माझी वाइफ बोलत असतो आणि एके दिवशी