________________
६४
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
नसेल तर हातातच येणार नाही ना! ती तर समाजामुळे दबून बसली आहे, नाहीतर केव्हाच पळून गेली असती. डायवोर्स घेतल्यानंतर मारुन तर पहा, काय होईल मग?
एक मिनिट सुद्धा भानगड होणार नाही त्याचे नांव पती. मित्रांसोबत जसे बिगडवू देत नाही त्याचप्रमाणे जपावे. मैत्री जपली नाही तर मैत्री तुटून जाते. मैत्री म्हणजे मैत्री. तिला अट सांगून द्यायची, 'की तू मैत्रीत आउट ऑफ मैत्री झालीस (मैत्री नाही निभावली) तर गुन्हा लागेल. एक होऊन मैत्री निभावायची!'
फ्रेंड (मित्रा)साठी इतके सिन्सियर राहता की, फ्रेंड दूर राहत असेल तरी तो बोलतो, माझा फ्रेंड तर असा. माझ्यासाठी वाईट विचार करणारच नाही. त्याचप्रमाणे पत्नीसाठीही वाईट विचार करु नये. फ्रेंडपेक्षा ती अधिक नाही का?
१८. पत्नी परतफेड करते तोलून मापून जर रात्री पत्नीसोबत तुमचे भांडण झाले असेल, तर त्याची तंत (पकड) तिला सकाळपर्यंत राहते, म्हणून सकाळी चहा देताना चहाचा कप असे जोरात आपटते. त्यावर तुम्ही समजून जा की हं.... तंत अजून आहे, शांत झाली नाही. असे आदळ-आपट करते त्याचे नांव तंत.
हे ती का करते, कशासाठी करते? तर ती तुम्हाला दाबू पहाते. आणि तू चिडलास की ती समजून जाते, चला आता नरम पडला. पण जर चिडला नाही तर ती जास्त करेल, इतकी कटकट करुन सुद्धा पती जर रागवत नसेल तर मग आत जाऊन दोन-चार भांडी आपटते. आपटण्याचे खणखण.... आवाज ऐकून पती चिडतो. तरीही जर तो चिडला नाही तर मुलाला चिमटा काढून रडवते, तेव्हा मात्र तो पप्पा चिडतो, 'तू मुलाच्या पाठी का लागली आहेस? तू मुलाला का मध्ये आणतेस?' असे तसे.... म्हणजे ती समजते की, हां, आता हा नरम पडला.
पुरुष घटना विसरुन जातात आणि स्त्रियांची नोंद तर संपूर्ण आयुष्य रहाते. पुरुष खूप भोळे असतात, मोठ्या मनाचे असतात. भद्रिक असतात,