________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
कधी करु नये. स्वत:चे मतच ठेवू नये जर तुम्ही मतच ठेवले नाही तर तुमचे खोटे पडणारच नाही. ज्याला गरज असेल तो मत ठेवेल, असे असायला हवे.
प्रश्नकर्ता : आपण हवे तितके शांत राहिलो, पण पुरुष रागावले तर आम्ही काय करावे?
दादाश्री : ते रागावतील आणि जर तुम्हालाही भांडण करायचे असेल तर तुम्ही देखील रागवा, अन्यथा तसे करणे बंद करा. फिल्म बंद करायची असेल तर शांत होऊन जा. फिल्म बंद करायची नसेल तर मग रात्रभर चालूच राहू द्या, कोण नको सांगतो तुम्हाला? आवडते खरी, फिल्म?
प्रश्नकर्ता : नाही, फिल्म नाही आवडत.
दादाश्री : रागवायचे कश्यासाठी? माणूस स्वतः रागवत नाही, हे तर मिकेनिकल एड्जस्टमेन्ट रागवत असते. स्वत: नाही रागवत. नंतर स्वत:ला मनात पश्चाताप होतो की रागवलो नसतो तर बरे झाले असते.
प्रश्नकर्ता : त्यांना थंड करण्याचा उपाय काय?
दादाश्री : हे तर मशीन गरम झाली असेल, आणि तिला थंड करायचे असेल तर थोड्यावेळेसाठी तशीच राहू द्या. म्हणजे मशीन आपोआप थंड होईल. हात लावाल, छेडखाणी कराल तर आपण भाजून
मरु.
प्रश्नकर्ता : आम्हा पति-पत्नीमध्ये रागवणे आणि चढाओढ होत असते, वादविवाद वगैरे सर्व पण होऊन जातात, तर मी काय करु?
दादाश्री : तू रागवतेस की तो? कोण रागवतो? प्रश्नकर्ता : पण मग माझ्याने पण होऊन जाते.
दादाश्री : तेव्हा आपण स्वत:च स्वत:ला आत ओरडायचे, का तू असे करतेस? जे (कर्म) केले ते भोगावे तर लागेलच ना! पण हे प्रतिक्रमण (पश्चाताप) केले तर सर्व दोष संपून जातील. नाहीतर आपण दुसऱ्यांना