________________
पति- पत्नीचा दिव्य व्यवहार
कुठलाही मनुष्य असे झोपतच नव्हता. कुठलाही क्षत्रिय नाही. क्षत्रिय तर खूप कडक होते पण वैश्य देखील नाही. ब्राह्मण देखील अश्याप्रकारे झोपत नसत, एकही मनुष्य नाही ! पहा, काळ कसा विचित्र आला आहे ?
१०२
जेव्हा पासून हीराबा सोबत माझा विषयविकार बंद झाला तेव्हापासून आम्ही त्यांना हीराबा बोलू लागलो. त्यानंतर आम्हाला खास काही अडचण आली नाही. आधी थोडी विषयामुळे ( अडचण ) होती, त्यांच्या सोबत थोडीफार पोपटमस्ती देखील होत असे. पण फक्त पोपटमस्ती. लोक समजत की ह्या पोपटाने पोपटीनला मारायला सुरुवात केली ! परंतु होते फक्त पोपटमस्ती. पण जोपर्यंत विषयचा डंख आहे तोपर्यंत ती जात नाही. जेव्हा हा डंख सुटेल तेव्हा जाईल. हा आमचा स्वतःचा अनुभव सांगत आहोत. हे तर आपले ज्ञान आहे म्हणून ठीक आहे. ज्ञान नसते तर डंख मारतच राहिलो असतो. तेव्हा तर अहंकार होता ना ! अहंकाराचा एक भाग भोग असतो की त्याने मला भोगले. आणि हा पण सांगणार तिने मला भोगून घेतले. आणि नंतर (ज्ञान घेतल्यावर) आता निकाल करते ती, तरीही ती डिस्चार्ज किच किच तर राहतेच. आम्हाला तर ती किच किच सुद्धा नव्हती. असा कुठल्याही प्रकारचा मतभेद नव्हता.
हे विज्ञान तर पहा! फक्त पत्नीसोबतची नव्हे तर संपूर्ण जगा सोबतची भांडणे बंद होऊन जातात. हे विज्ञानच असे आहे आणि भांडणे बंद झाली अर्थात मुक्त झालात.
२४. रहस्य ऋणानुबंधाचे......
लग्न तर खरोखर एक बंधनच आहे. म्हशीला (रेलगाडीच्या) डब्यात बंद केल्यासारखी दशा होते. ह्या फसवणुकीत नाही फसलात तर उत्तम, फसले गेले असाल पण तरीही त्यातून निघता आले तर अति उत्तम. नाहीतर शेवटी फळ चाखल्यानंतर निघाले पाहिजे. बाकी, आत्मा स्त्री किंवा पुरुष, कोणाचा पती, किंवा कोणाचा मुलगा होऊ शकत नाही, फक्त ही सर्व कर्मे पूर्ण होत आहेत. आत्म्यामध्ये तर काही फेरफार होत नाही. आत्मा तर आत्माच आहे, परमात्माच आहे. हे तर आपण मानून बसलो की ही माझी पत्नी !