________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
डोक्यावर हात ठेऊन, डोक्यावर हात फिरवून...... असे काहीतरी करावे की होऊन जातील.
मग चूप
८७
जर अक्कलेने काम होत असेल तर अक्कल वापरावी. मग दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला म्हणेल, 'बघ, माझ्या पाया पडली होतीस ना ?' तेव्हा तुम्ही बोला, ती गोष्ट वेगळी होती, त्या दिवशी तुम्ही पळून जात होतात, वेडेपणा करत होतात म्हणून पाया पडले! त्यांना असे वाटते की नेहमीसीठीच पाया पडेल, पण ते तर तात्पुरतेच होते. ऑन दि मोमेन्ट (तात्पुरते) होते!
२१. सप्तपदीचे सार...
जीवन जगण्याची कलाच ह्या काळात उपलब्ध नाही, मोक्ष मार्ग तर जाऊ द्या पण जीवन जगता तरी आले पाहिजे ना ? इतकेच समजायचे आहे की ह्या मार्गावर असे आहे आणि त्या मार्गावर असे आहे. आणि नंतर नक्की करायचे की कोणत्या मार्गाने जायचे ? आणि समजत नसेल तर, 'दादा' नां विचाराचे, तर ‘दादा' तुम्हाला दाखवतील की, हे तीन रस्ते जोखमीचे आहेत आणि हा रस्ता बिनजोखमिचा आहे. मग दाखवलेल्या रस्त्यावर आमचा आशीवार्द घेऊन चालायचे आहे.
विवाहीत लोकांना असे वाटते की आम्ही तर उलट, फसलो ! अविवाहीतांना वाटते की ह्यांचे तर चांगले चालले आहे ! ह्या दोघांमधील गैरसमज कोण दूर करणार ? आणि लग्न केल्याशिवाय चालेल असेही नाही ह्या जगात! लग्न करून तरी दुःखी कशाला व्हायचे ? तेव्हा सांगतात, ते दुःखी नाही होत पण, एक्सपिरियंस (अनुभव) घेत आहेत. संसार खरा आहे की खोटा आहे, सुख आहे की नाही ? ! हा हिशोब काढण्यासाठी संसार आहे. तुम्ही तुमच्या वही-खात्याचा थोडातरी हिशोब काढला आहे का ?
संपूर्ण संसार तेलाच्या घाणी सारखा आहे. पुरुष बैलांच्या जागी आहेत तर स्त्रिया तेल काढणाऱ्याच्या तेलीच्या जागी आहेत. तिथे तेली गाणी गात असतो तर इथे स्त्रिया गात असतात ! आणि बैल डोळ्यावर पट्टी बांधून स्वत:च्या धुंधीतच चालत असतात ! गोल गोल फिरत राहतात. असेच ते दिवसभर बाहेर काम करतात आणि असे समजतात की आता आपण