________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
काशीला पोहचलो असू!! आणि जेव्हा पट्टी खोलून पाहतात तर काय! भाऊसाहेब तिथल्या तिथेच असतात!! मग तेली त्या बैलाला काय करतो! थोडासा चारा खायला देतो म्हणजे बैल खुश होऊन पुन्हा गोल गोल फिरु लागतो. तसेच ह्या बायका चांगले जेवण खाऊ-पिऊ घालतात तर आपले भाऊ साहेब आरामात खाऊन-पिऊन पुन्हा सुरु!
आता जीवन जगणे कठीण झाले आहे. नवरा घरी येऊन म्हणेल की, 'माझ्या हार्टमध्ये दुखत आहे.' मुलगा येऊन बोलतो की, 'मी नापास झालो
आहे.' नवऱ्याच्या छातीत दुखतय तर त्यावेळी तिला असा विचार येतो की, 'हार्ट फेल' झाले तर काय होईल. तहे त-हेचे विचार फिरत राहतात. चैन पडत नाही.
लग्नाची किंमत केव्हा वाटेल? लाखो माणसात जेव्हा एकालाच लग्न करण्याची सवलत मिळाली असती तेव्हा. हे तर सर्वच लग्न करतात, त्यात काय विशेष? पति-पत्नीने (लग्नानंतर) व्यवहार कसे करावे, ह्याचे तर खूप मोठे कॉलेज आहे. हे तर न शिकताच लग्न करतात.
एकदा अपमान झाला, तर तो अपमान सहन करायला काही हरकत नाही. परंतु अपमान लक्षात ठेवण्याची गरज आहे की, काय अपमानासाठी आपले जीवन आहे. अपमानाची हरकत नाही, मानाचीही गरज नाही आणि अपमानाचीही गरज नाही. पण असे तर लक्षात असले पाहिजे ना की आपले जीवन काय अपमानासाठी आहे?
बीबी रुसली असेल तोपर्यंत 'या अल्लाह परवरदिगार' असे करतो आणि बीबी बोलायला लागली की भाऊ तैयार! मग अल्ला आणि बाकी सगळे राहिले बाजूला! किती गोंधण! अश्याने काही दुःख मिटणार आहेत?
संसार म्हणजे काय? जंजाळ (सापळा). हे शरीर मिळाले आहे, ते सुद्धा सापळा आहे! सापळे आवडतात का कधी? पण तेही आवडतात हेच किती अजब आहे ना! माश्यांचे जाळे वेगळे आणि हे जाळे वेगळे ! माश्यांच्या जाळ्याला तर कापून सुद्धा सुटता येते, ह्या संसाररुपी जाळ्यातून मात्र सुटता येत नाही अर्थी निधाल्यावरच सुटका होते.