________________
पति- पत्नीचा दिव्य व्यवहार
करणार नाही! आणि हा तर बिनपैशाचे भांडतो, मग त्याला अनाडी नाही तर दुसरे काय म्हणावे ? भगवान महावीरांना आपले कर्म संपवण्यासाठी साठ मैल चालून अनाडी क्षेत्रात जावे लागत होते, आणि ह्या काळातले लोक तर किती पुण्यशाली आहेत की, घरच्याघरात अनाडी क्षेत्र आहे ! कसे अहोभाग्य ! कर्म संपवण्यासाठी हे तर अत्यंत लाभदायी आहे. पण सरळ राहिले तर...
६२
घरात कोणी विचारले, सल्ला मागितला तरच उत्तर द्यावे. विचारल्याशिवाय सल्ला देत बसतो त्याला भगवंताने अहंकार म्हटले आहे. पतीने विचारले की, हे ग्लास कुठे ठेवायचे आहे ? तेव्हा पत्नी उत्तर देते की, अमक्या जागी ठेवा. तेव्हा तुम्ही तिथे ठेऊन द्यावे. पण त्या ऐवजी तो म्हणतो, 'तुला अक्कल नाही, इथे कुठे ठेवायला सांगतेस?' तेव्हा पत्नी म्हणते की, ‘अक्कल नाही म्हणून तर मी तुम्हाला असे सांगितले, आता तुमच्या अक्कलेनुसार ठेवा.' ह्याचा अंत कधी येणार ? ही केवळ संयोगांची आदळ-आपट आहे ? म्हणजे भवरे, खातांना, उठतांना आपटतच राहतात! मग टेचले, जातात सोलले जातात आणि रक्त निघू लागते!! पण ह्यात तर मानसिक रक्त निघते ना! ते रक्त निघत असेल तर ठीक, तिथे पट्टी बांधल्यावर थांबेल. परंतु ह्या मानसिक घावावर तर कुठलीच पट्टी नाही ना!
घरात कोणालाही, पत्नीला, लहान मुलीला, कोणत्याही जीवाला झिडकारुन मोक्षाला जाऊ शकत नाही. कोणाला जरा सुद्धा झिडकारले तर तो मोक्षचा मार्ग नाही.
प्रश्नकर्ता : तिरस्कार आणि झिडकारणे ह्या दोघात काय फरक ?
दादाश्री : झिडकारने आणि तिरस्कारात तर, तिरस्काराची तर कदाचित माहितीही पडणार नाही. झिडकारण्यासमोर तिरस्कार ही तर एकदम माईल्ड (छोटी) वस्तू आहे. परंतु झिडकारणे हे तर अतिशय उग्र स्वरूप आहे. झिडकारल्यावर लगेचच रक्त निघेल असे आहे. ह्या देहाचे रक्त नाही निघणार, पण मनाचे रक्त निघेल, असे झिडकारणे ही भारी वस्तू आहे.