________________
४०
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
आम्हाला सुद्धा सुरुवातीला तीस वर्षापर्यंत जरा त्रास झाला होता. पण नंतर निवडून निवडून सर्व निकाल केले आणि डिविजन करुन दिले की स्वयंपाकघर खाते तुमचे आणि कमवायचे खाते आमचे, कमवायचे आम्ही. तुमच्या खात्यात आम्ही दखल करणार नाही आणि आमच्या खात्यात तुम्ही दखल करायची नाही. भाजीपाला त्यांनी घेऊन यायचे.
आमच्या घरची पद्धत तुम्ही पाहिलीत तर खूप सुंदर वाटेल. जोपर्यंत हीराबांची तब्बेत चांगली होती, तोपर्यंत गल्लीच्या नाक्यावर भाजीवाला होता तेथून त्या स्वतः भाजी आणाच्या. तेव्हा आम्ही बसलेले असू, तर हीराबा आम्हाला विचारायच्या, 'काय भाजी आणू?' तेव्हा आम्ही सांगत असू की, 'तुम्हाला जे योग्य वाटते ते आणा.' मग त्या घेऊन येत. पण रोजच्या रोज असेच चालले तर काय होणार? तेव्हा मग विचारायचे बंद करणार, जळो, नेहमी हे काय बोलतात, तुम्हाला ठीक वाटेल ते आणा. म्हणून पाच-सात दिवस हीराबांनी विचारणे बंद केले. तेव्हा मग एक दिवस मी विचारले की, 'कारले का आणले?' तेव्हा त्या म्हणाल्या, मी जेव्हा विचारते तेव्हा तुम्ही म्हणता, 'तुम्हाला जे ठिक वाटेल ते आणा, आणि आज ठिक वाटले ते आणले तर तुम्ही चुक काढता?' तेव्हा मी म्हणालो, 'नाही, आपण अशी पद्धत ठेवायची, तुम्ही मला विचारायचे काय भाजी आणू? तेव्हा मी म्हणेल, तुम्हाला जे ठिक वाटेल ते आणा,' आपली ही पद्धत चालू ठेवा. आणि त्यांनी ही परंपरा शेवटपर्यंत टिकवली. ह्यात पाहणाऱ्यांना पण शोभेसे वाटेल की, वाह ! काय ह्या घरची पद्धत !
अर्थात् आपला व्यवहार बाहेर चांगला दिसायला हवा. एकपक्षी झाले नाही पाहिजे. महावीर भगवान कसे पक्के होते ! व्यवहार आणि निश्चच दोन्ही वेगळे, एकपक्षी नाही. लोक पाहत नाही का व्यवहार? रोजच पाहत होते. 'रोज ह्या बाबतीत हीराबा तुम्हाला विचारतात?' मी म्हणालो, 'हो रोजच विचारतात.''तर मग थकत नाहीत?' मी म्हणालो, 'अरे, का थकणार ? त्यांना काही मजले चढायचे होते की डोंगर चढायचे होते?' 'अर्थात् आपला दोघांचा व्यवहार असा असावा की लोक पाहतच राहतील.'
प्रश्नकर्ता : स्त्रियांनी पुरुषांच्या कोणत्या बाबतीत दखल करु नये ?