________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
विश्वासघात नसतो. कपट आणि विश्वासघात हे तर 'फुलिश' (मूर्ख) लोकांकडे असतो. कलियुगात 'फुलिश'च एकत्र झाले आहेत ना !
लोकं म्हणत असतील की, हा नालायक माणूस आहे, तरीही आपण त्याला लायक म्हणावे. कारण कदाचित नालायक नसेलही आणि त्यास नालायक म्हणाल तर तो मोठा दोष ठरेल. सती असेल आणि जर वेश्या म्हणाल तर भयंकर गुन्हा आहे, आणि त्यासाठी कितीतरी जन्म भोगावे लागतील. म्हणून कुणाच्याही चारित्र्याबद्दल बोलू नका. कारण की ते खोटे निघाले तर? लोकांच्या बोलण्याने आपणही बोलू लागलो तर, त्यात आपली काय किंमत राहिली? आम्ही तर असे कधीही कोणाच्या बाबतीत बोलत नाही, आणि कुणालाही बोललो नाही, मी तर ह्यात हातच घालत नाही ना ! ती जाबबदारी कोण घेणार? कोणाच्याही चारित्र्यावर शंका करु नये. त्यात मोठी जोखीम आहे. आम्ही तर शंका कधीही करत नाही. आपण जोखीम कशाला घ्यायची?
एका माणसाला त्याच्या वाईफवर सारखी शंका येत होती. मी त्याला विचारले की कशावरुन शंका होते? तू पाहिलेस त्यामुळे शंका घेतोस? जेव्हा पाहिले नव्हतेस, तेव्हा असे घडत नव्हेत का? लोक तर जो पकडला जातो त्यालाच चोर म्हणतात, पण जे पकडले गेले नाही ते सर्व आतून चोरच आहेत. परंतु हे तर, जो पकडला गेला त्यालाच चोर म्हणतात. अरे! त्याला चोर कशाला म्हणता? तो तर भोळा होता, लहान-सहान चोरी केली म्हणून पकडला गेला, मोठी चोरी करणारा पकडला जातो का?
अर्थात् ज्यांना पत्नीच्या चारित्र्यसंबंधी शांती हवी असेल, तर त्यांनी एकदम काळी कुरुप बायको केली पाहिजे, म्हणजे तिचे कोणी ग्राहकच नाही बनणार, कोणी तिला विचारणारच नाही.... आणि ती स्वत:च असे म्हणेल की, मला कोणी विचारणारच नाही. हा एक नवरा मिळाला आहे तोच सांभळतो. म्हणजे ती तुमच्या प्रती सिन्सियर राहिल, खूप सिन्सियर राहिल. जर, सुंदर पत्नी असेल तर, तिला लोक भोगतीलच. सुंदर आहे म्हणून लोकांची दृष्टि बिगडणारच! कोणी सुंदर देखणी बायको केली असेल तर, आम्हाला विचार येतो की काय दशा होणार त्याची ! काळी कुरुप असेल, तरच सेफ साइड राहिल.