________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
आणि आपण नाही करणार तर मग आपली 'लिमिट' झाली पूर्ण. पुरुष असेल तर तो असे बोलेल की ‘वाइफ' खुश होईल असे करुन गाडी पूढे चालू करुन देईल आणि तुम्ही तर पंधरा-पंधरा दिवस, महिना-महिनापर्यंत गाडी तशीच ठेवाल, हे नाही चालायचे. जोपर्यंत समोरच्याच्या मनाचे समाधान नाही होत तोपर्यंत तुम्हाला अडचण येणार म्हणून समाधान करावे.
घरात असे मतभेद होत असतील तर कसे चालेल? बायको म्हणेल की 'मी तुमची आहे' आणि नवरा बोलेल की 'मी तुझा आहे' मग मतभेद का? जस-जसे तुमच्या दोघात 'प्रोब्लेम' वाढत जाईल तसे तुम्ही वेगळे होत जाल. 'प्रोब्लेम' 'सॉल्व' झाल्यावर वेगळे होणार नाही. वेगळेपणात दु:ख आहे. 'प्रोब्लेम' तर सर्वांनाच होणार, तुम्हाला एकट्याला होत आहे असे नाही. जेवढ्यांनी लग्न केले, त्यां सर्वांना 'प्रोब्लेम' उभे झाल्या शिवाय रहात नाही.
बायकोसोबत मतभेद होत असतो, मुर्खाला! जिच्या बरोबर.... डबल बेड असतो की एक अंथरुण असते?
प्रश्नकर्ता : नाही, माफ करा. एकच असते.
दादाश्री : तर मग तिच्या बरोबर भांडण झाले आणि तिने रात्री लाथ मारली तर काय करशील?
प्रश्नकर्ता : खाली.(पडेल)
दादाश्री : तर मग तिच्याबरोबर एकता ठेवावी. वाइफबरोबर पण मतभेद झाले, तिथे पण एकता राखली नाही तर मग आणखी कुठे राखणार? एकता म्हणजे काय की कुठेही मतभेद होणार नाही! ह्या एका व्यक्तीसोबत नक्की करा की तुझ्यात नि माझ्यात मतभेद असणार नाहीत, इतकी एकता राहिली पाहिजे. एवढी एकता ठेवली आहे का तुम्ही?
प्रश्नकर्ता : असा विचार कधी केला नव्हता. पहिल्यांदा असा विचार करतो आहे.
दादाश्री : हो, असा विचार करावा लागेल ना? खूप खूप विचार केल्यानंतर भगवान मोक्षला गेले!