________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
३७
८. सुधारावे की सुधरावे हे संबंध रिलेटिव (सापेक्ष) आहेत. काही लोकं काय करतात पत्नीला सुधारण्यासाठी इतके हट्ट करतात की प्रेमाची दोरी तुटून जाईल एवढा हट्टीपणा पकडून ठेवतात. ते समजतात की मला सुधारावीच लागेल हिला. अरे! तू सुधर ना! तू स्वतः सुधर एकदाचा. आणि हे तर रियल नाही, रिलेटिव आहे. वेगळे होऊन जाईल. म्हणून आपल्याला खोटे तर खोटे पण तिची गाडी पटरीवर चढवायची. इथून पटरीवर चढली तर स्टेशन वर पोहचेल, सटासट. अर्थात् हे रिलेटिव आहे. आणि समजावून ऊमजावून निवाडा करावा.
प्रश्नकर्ता : प्रकृती नाही सुधरत, पण व्यवहार तर सुधारला पाहिजे
ना?
दादाश्री : व्यवहार तर लोकांना करताच येत नाही. जर कधी व्यवहार करता आले असते तरी खूप झाले! व्यवहार तर समजलेच नाहीत. व्यवहार म्हणजे काय? वरच्या वर. व्यवहार म्हणजे सत्य नाही. हे तर व्यवहारालाच सत्य मानून घेतले आहे. व्यवहाराचे सत्य म्हणजे रिलेटिव सत्य. म्हणून इथल्या नोटा खऱ्या असो अथवा नकली असो दोन्ही तिथे (मोक्षच्या) स्टेशनवर उपयोगी पडणार नाहीत. म्हणून त्यांना सोडा आणि आपण आपले काम साधून घ्या. व्यवहार म्हणजे दिलेले परत करायचे, तेच. आता कोणी म्हटले की, तुझ्यात अक्कल नाही. तर समजून जा की हे मी दिले होते, ते परत आले. हे असे जर समजलात तर त्याला व्यवहार म्हणतात. आजकाल असा व्यवहार कोणाचाच नाही. ज्याचा व्यवहार व्यवहार आहे. त्याचा निश्चय निश्चय आहे.
कोणी म्हणेल की, भाऊ, त्याला सरळ करा, 'अरे!' तिला सरळ करायला जाशील तर, तूच वाकडा होशील. म्हणून वाइफला सरळ करायला जाऊ नका, जशी आहे तशी तिला 'करेक्ट' म्हणा. आपल्याला तिच्याबरोबर कायमचे देणे-घेणे असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. हे तर एका जन्मानंतर कुठल्याकुठे विखरुन जातील. दोघांचा मरणकाळ भिन्न, दोघांचे कर्म भिन्न. काही घेणे पण नाही आणि देणे पण नाही. इथून नंतर ती कोणाकडे जाईल