________________
दान
17
इस्पितळे आहेत! या मुंबईचे धन भरपूर, समुद्रा एवढे धन आहे. आणि
जाते.
ते
समुद्रातच
प्रश्नकर्ता : मुंबईतच लक्ष्मी प्राप्त होते, त्याचे कारण काय ?
दादाश्री : मुंबईतच लक्ष्मी प्राप्त होते ? नियमच असा आहे की मुंबईत उच्चाहून उच्च प्रकारची वस्तू खेचली जाते.
प्रश्नकर्ता : ते भूमिचे गुण आहे ?
दादाश्री : भूमिचेच तर आहे. मुंबईत सर्वात उच्च वस्तू खेचल्या जातात. मिरच्याही उत्तम, महान पुरुष, तेही मुंबईतच होतात आणि सर्वात नीच, नालायक माणसे, ते सुद्धा मुंबईतच होतात. मुंबईत दोन्ही क्वॉलिटी असतात. म्हणजे गावात जर हे शोधायला जाल तर मिळणार नाही.
प्रश्नकर्ता : मुंबईत समदृष्टी असलेले लोक आहेत ना ?
दादाश्री : सगळी पुण्यावानांची जत्रा आहे. एका प्रकारे ही पुण्यवानांची जत्राच आहे. आणि सर्व पुण्यवान एकत्र खेचले जातात.
मुंबईचे लोक सर्वकाही निभावून घेतात. ते तसे दुसरे काही करत नाही. आणि स्वत:च्या पायावर दुसऱ्याच्या पायाचा बूट पडला ना, तर प्लीज, प्लीज करतात, मारत नाही, आणि गावात तर मारतात. म्हणून हे मुंबईचे लोक डेवलप ( विकसित ) म्हटले जातात.
धन चालले गटारीत
लोकांचे धन गटारीतच जात आहे ना. चांगल्या मार्गाने तर एखाद्या पुण्यवानाचेच जाते ना! धन गटारीत जाते का ?
प्रश्नकर्ता : जातच आहे ना सगळे ?
दादाश्री : या मुंबईच्या गटारीत तर पुष्कळ धन, ढीगभर धन चालले