________________
54
दान
अनन्य भक्ति, तेथे दिले जाते आपल्याला मोक्षगतीत जायचे आहे. तेथे मोक्ष प्राप्ती करु शकू तेवढे पुण्य पाहिजे. इथे तुम्ही सीमंधर स्वामींचे जेवढे कराल त्यात तुमचे सर्व आले. पुष्कळ झाले! त्यात असे नाही की हे कमी आहे. त्यात तर तुम्ही जे (देण्यासाठी) ठरवले असेल, ते सगळे करा. मग त्यात सर्व आले. मग त्याहून जास्त करण्याची गरज नाही. मग हॉस्पिटल बनवा किंवा आणखी काही बनवा. ते सगळे वेगळ्या मार्गाने जाते.
हे आहेत जीवंत देव लक्ष्मीच्या सदुपयोगाचा अगदी खरा मार्ग कोणता आहे आता? तेव्हा म्हणे, ‘बाहेर दान देणे तो? कॉलेजमध्ये पैसे द्यावे तो?' तेव्हा म्हणे, नाही! आपल्या या महात्म्यांना नाश्टा द्या. त्यांना संतोष देणे. तो सर्वात उत्तम मार्ग. असे महात्मा जगात कुठेही मिळणार नाहीत. तेथे सत्युगच दिसतो आणि ते सर्व आले तर कशा प्रकारे तुमचे भले होवो, हीच त्यांची भावना दिवसभर असते.
पैसे नसतील ना, तर त्यांच्याकडे राहा, जेवा, ते सर्व आपलेच आहे. समोरासमोर पारस्पारिक आहे, ज्यांच्याकडे सरप्लस आहे त्यांनी खर्च करावे. आणि अधिक जास्त असेल तर मनुष्य मात्राला सुखी करा, ते चांगले आहे आणि त्याच्याही पुढे, समस्त जीवांच्या सुखासाठी खर्च करा.
बाकी शाळेत द्याल, कॉलेजात द्याल त्याने प्रसिद्धी होईल, पण खरे हे आहे. हे महात्मा एकदम खरे आहेत, याची गॅरेंटी देतो, भले कसेही असोत. पैसे कमी असले तरी त्यांची दानत साफ आहे आणि भावनाही फार सुंदर आहे. प्रकृती तर वेगवेगळी असतेच. हे महात्मा तर जिवंतजागृत देव आहेत. त्यांच्या आत आत्मा प्रकट झालेला आहे. एक क्षण सुद्धा आत्म्याला विसरत नाहीत. तेथे आत्मा प्रकट झाला आहे, तेथे देव आहे.
प्रश्नकर्ता : लोकांना जेऊ-खाऊ घातले तर ते फलीभूत होत नाही?