________________
दान
59
दादाजींच्या हृदयांची गोष्ट इतके सारे पत्र येतात की आपण कसे सांभाळावे तेच कठीण आहे. म्हणून मग आता अन्य लोक छापून घेतील तेव्हाच होईल. आपण तर हे मोफत देतो, पहिल्यांदा, फर्स्ट टाइम. नंतर लोक आपल्या आपण छापून घेतील. हे तर आपले हे ज्ञान समोर आले आहे ते लुप्त होऊ नये, म्हणून छापून घ्यायचे आहे. आणि कोणी ना कोणी तर भेटतातच, स्वत:हूनच हो म्हणतो. आमच्या ये लॉ (कायदा) नाही. नो लॉ तोच लॉ.
प्रियला सोडा तरच समाधि समाधि केव्हा येईल? संसारात ज्याच्यावर अतिशय प्रेम आहे, त्यास मोकळे सोडता येईल तेव्हा. संसारात कोणावर अतिशय प्रेम आहे ? तर लक्ष्मीजी वर. म्हणून तिला मोकळी सोडा. तेव्हा म्हणतात की सोडून दिली तेव्हा आणखी जस्त येऊ लागते. तेव्हा मी म्हणालो की, जास्त आली तर जास्त जाऊ द्या. प्रिय वस्तू सोडली तर समाधि वाटते.
__ असा आहे मोक्षमार्ग हे भाऊ लुटवून देत होते. नंतर मला विचारत होते की हा मोक्षाचा मार्ग आहे का? मी म्हणालो, 'हाच मोक्षमार्ग आहे, मग याहून दुसरा मोक्षाचा मार्ग कसा असतो? स्वतःजवळ असेल ते लुटवून द्यावे मोक्षासाठी. त्याचे नाव मोक्षमार्ग. शेवटी तर सोडायचेच आहे ना? शेवटी तर सोडतोच, सोडल्याशिवाय चालते का कोणाला? तुम्हाला कसे वाटते?
जे स्वतः जवळ आहे ते लुटवून द्यावे आणि ते सुद्धा चांगल्या कामासाठी, मोक्षासाठी किंवा मोक्षार्थीसाठी, जिज्ञासुंसाठी किंवा ज्ञानदानासाठी लुटवणे, तोच मोक्षमार्ग आहे.