________________
56
दान
पाणी पाजले, खाऊ घातले, जेवण दिले, हा सर्वात मोठा यज्ञ म्हणवतो. प्रथम कक्षेचा यज्ञ. बांगड्या विकून जरी जेवण दिले ना, तरीही खूप चांगले! बांगड्या शांती देत नाहीत. महात्म्यांसोबत बसलो तर त्यांची नियत वाईट नाही. म्हणून या महात्म्यांना जितके खाऊ घालता येईल तितके घालत जा. चहा जरी पाजलात तरी फार झाले.
अशी समज द्यावी लागते
एक मनुष्य माझा सल्ला मागत होता की मला पैसे द्यायचे आहे, तर मी कशा प्रकारे देऊ? तेव्हा मी विचार केला, याला पैसे देण्याची समज नाही. मी म्हणालो, तुझ्याजवळ पैसे आहेत ? तर तो म्हणाला 'हो'. तेव्हा मी म्हणालो की, 'अशा प्रकारे दे.' मी जाणत होतो की तो माणूस मनाचा खूपच स्वच्छ आहे, आणि भोळाभाबडा आहे. त्याला खरी समज दयावी.
म्हणजे गोष्ट अशी होती की आम्ही एका सदगृहस्थाकडे गेलो होतो. त्याने मला गाडीत सोडण्यासाठी एक माणूस पाठवला. फक्त सोडण्यासाठीच. त्याने त्या डॉक्टरला सांगितले की दादाजींना गाडीत सोडायला तुम्ही जाऊ नका, मी त्यांना सोडून येईल. म्हणजे असे ते सोडायला आले आणि त्यात आमचा वार्तालाप झाला. तो माणूस माझा सल्ला मागत होता की ‘मला पैसे द्यायचे आहे तर ते कुठे द्यायचे, कसे द्यायचे ?' बंगला बनवला आहे म्हणजे पैसे तर कमवले असतील. त्यावर तो म्हणाला, 'बंगला बनवला, सिनेमा थियेटर बनवले. आताच सव्वा लाख रुपयांचे तर माझ्या गावात दान दिले. ' तेव्हा मी म्हणालो की, 'जास्त कमवले असाल, तर एखादी आप्तवाणी छापून द्या.' त्यावर लगेच तो म्हणाला 'तुमच्या सांगण्याचीच वेळ आहे, हे तर मला माहितच नव्हते. मला कोणी समजावतच नाही.' मग तो म्हणाला, 'या महिन्यातच लगेच छापून देईन.' नंतर पुढे विचारतो की किती खर्च होईल ? तेव्हा म्हणालो की, 'वीस हजार होतील, ' लगेच म्हणतो की, 'इतकी पुस्तके मला छापून द्यायची आहेत!' मी त्याला घाई न करण्यास सांगितले.