________________
दान
43
जिथे वाह-वाह होत नसे तिथे मग धर्म असो किंवा काहीही असो, पण तिथे देऊ शकत नव्हतो आणि वाह-वाह केली की सगळी कमाई लुटवून देत असे, कर्ज करुन सुद्धा. आता ही वाह-वाह किती दिवस? तिन दिवस. नंतर काहीच नाही. तीन दिवसापर्यंत ओरडतात जरा, नंतर बंद होऊन जाते.
बघा ना, मला आठवते, शभर द्यायचे तिथे पंत्याहत्तर परत घेत होतो. मला आजही ते दिसते, अजूनही. ते ऑफिस दिसते. पण मी म्हणालो, 'असा ढंग!' लोकांचे किती मोठे मन असते. मी आपला ढंग समजून गेलो होतो. ढंग सर्व. तसे मनही मोठे होते. पण वाह-वाह, गुदगुल्या करणारा पाहिजे. गुदगुल्या केल्या की मग चालू.
प्रश्नकर्ता : हा जिवाचा स्वभाव आहे?
दादाश्री : हो, ती प्रकृति, सगळी प्रकृति आहे.
आणि हे पक्के, ते वाणी बसले आहेत ना, ते पक्के. ते वाह-वाहीने ठगले जात नाही. ते तर विचार करतात की पुढे जमा होत आहे की मग इथल्या इथेच राहते? आणि ते वाह-वाहवाले तर इथेच वापरुन टाकले, त्याचे फळ तर मी घेऊन टाकले, चव पण घेतली मी. आणि हे वाणी लोक तर वाह-वाह शोधत नाही, तिथे फळ शोधतात ते लोक. ओवरड्राफ्ट, फारच विचारशील आणि पक्के लोक ना! आमच्या एकापेक्षा जास्त विचारशील. आम्ही क्षत्रिय तर एक वार आणि दोन तुकडे करणारे. सर्व तीर्थंकर क्षत्रियच होते. साधु स्वतःच सांगतात की आम्ही तीर्थंकर होऊ शकत नाही. कारण आम्ही कितीतरी त्याग करुन साधु झालो पण तरी एखादी गिनी(सोन्याचे नाणे) आमच्याजवळ राहू देतो, कधी अडचण आली तर? ही त्यांची मूळ ग्रंथी आणि तुम्ही तर लगेच देऊन टाकता. प्रोमिस टू पे म्हणजे सगळे प्रोमिसच! दूसरे काही येतच नाही ना! दूसरी समज नाही आत. थिंकर (विचारक)च नाही. पण त्यांची सुटका लवकर होते.