________________
दान
छापली गेली तर ती कामाची, नाहीतर असेच भटकत राहण्यात काय अर्थ? आणि ते सुद्धा सगळे लोक वाचतही नाही. एकदा वाचून ठेवून देतात. परत काही वाचत नाहीत. अरे, एकदा सुद्धा संपूर्ण वाचत नाही. लोकांना उपयोगी पडेल असे पुस्तक छापले तर आमच्या पैशांचा सदुपयोग होतो आणि ते सुद्धा पुण्य असेल तेव्हाच ना. पैसे चांगले असले तेव्हाच छापू शकतो, नाहीतर छापूही शकत नाही ना! तशा मेळ बसतच नाही ना! पैसे तर येतील आणि जातील. आणि क्रेडीट हे नेहमीच डेबिट झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या इथे कसा नियम आहे ? क्रेडीटच होत राहते की डेबिट पण होते?
प्रश्नकर्ता : दोन्हीकडे आहे. दादाश्री : म्हणजे नेहमी क्रेडीट-डेबिटच होत राहते. प्रश्नकर्ता : तेच झाले पाहिजे.
दादाश्री : पण त्याचे दोन मार्ग आहेत. डेबिट एक तर चांगल्या मार्गाने जाते किंवा गटारीत जाते, पण या पैकी एका मार्गाने तर जातो. अख्ख्या मुंबईचे धन गटारीतच जात आहे. सगळेच धन गटारीत जाते....
मुंबई म्हणजे पुण्यवंतांची जत्रा प्रश्नकर्ता : मोठे-मोठे दान मुंबईतच होतात. लाखो-करोडो रुपये दानात दिले जातात.
दादाश्री : हो, पण ते सर्व दान तर कीर्तीदान आहे. आणि कित्येक चांगल्या वस्तूही आहेत. औषधदान होते, अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे इतरही बरेच काही आहे मुंबईत.
प्रश्नकर्ता : त्या सर्वांना लाभ मिळतो की नाही?
दादाश्री : पुष्कळ लाभ मिळतो. ते तर सोडत नाही ना हा लाभ! पण या मुंबईत केवढे सारे धन आहे ? या करणा मुळेच तर इथे कितीतरी